तुमच्या १७६० पिढ्या आल्या तरीही मुंबई स्वतंत्र होणार नाही; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल
मुंबई : शिवसेनेने हिंदुत्वाचा मुद्दा केंद्रस्थानी ठेवून शिवसंपर्क अभियनाची (Shivsena rally) सभा मुंबईच्या बीकेसी मैदानात घेतली. विरोधकांच्या आरोपांचा समाचार घेण्यासाठी शिवसेनेनं पोस्टर आणि व्हिडिओ टीझरद्वारे विरोधकांवर तोफ डागली आहे. शिवसेनेकडून आक्रमक टीझरही प्रदर्शीत करण्यात आले. याच पार्श्वभूमीवर हजारोंच्या संख्येत शिवसैनिक (Shivsena) बीकेसी मैदानावर पोहोचले. शिवसेनेनं शिवाजी पार्क ते बीकेसी मैदानापर्यंत बाईक रॅलीही काढली. बाईक रॅलीत हनुमान रथ सजवण्यात आला असून हिंदुत्व काय असतं हे शिवसैनिक रॅलीच्या माध्यमातून दाखवून दिलं. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिवसेनेच्या विराट सभेतून भाजपवर तोफ डागली आहे. शिवसेनेच्या सभेत मुख्यमंत्री ठाकरे यांनी मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा उल्लेख करुन विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर शरसंधान साधलं आहे.
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन सुरु करण्यावरून राजकीय वातावरण तापलं होतं. भाजप सरकारवर शिवसेनेनं यापूर्वीही जोरदार टीका केली होती. आजच्या शिवसेनेच्या सभेत मुख्यमंत्री ठाकरे यांनी बुलेट ट्रेनचा उल्लेख करुन भाजपवर शरसंधान साधलं. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस मुंबई स्वतंत्र करण्याचं वक्तव्य केलं होतं. या वक्तव्याचा ठाकरे यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. तुमच्या १७६० पिढ्या आल्या तरीही मुंबई स्वतंत्र होणार नाही.कोणीही आले तरी ही मुंबई स्वतंत्र होऊ देणार नाही.बुलेट ट्रेन कशाला हवीये, कोणाल हवीये. तुम्हाला मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करायची आहे.असा सवाल करत मुख्यमंत्र्यांनी भाजपवर तोफ डागली आहे.
यावेळी शिवसेनेच्या विराट सभेत शिवसैनिकांना संबोधताना मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले,तुमच्या प्रमाणे मला मोकळं वाटतंय. बऱ्याच दिवसांपासून बोलायचे होते.छत्रपती संभाजी महाराजांना वंदन करतो. खोटा हिंदुत्वाचा बुरखा घातलेला आपल्या सोबत होता, ते आता देशाची दिशा भरकटवत आहेत.गदा पेलायला हातात ताकद पाहिजे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांवर टीका केली आहे. तुमच्या १७६० पिढ्या आल्या तरीही मुंबई स्वतंत्र होणार नाही. कोणीही आले तरी ही मुंबई स्वतंत्र होऊ देणार नाही. बुलेट ट्रेन कशाला हवीये, कोणाल हवीये. तुम्हाला मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करायची आहे.
मागे खोटा हिंदुत्वाचा बुरखा घातलेला पक्ष आपल्यासोबत होता,ते देशाची दिशा भरकटवत आहेत असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर हल्लाबोल केला.ते म्हणाले की, बाळासाहेबांना देवळात घंटा बडवणारा हिंदू नको होता तर अतिरेक्यांना बडवणारा हिंदू पाहिजे होता.आपले हिंदुत्व गदाधारी आहे, इतरांचे घंटाधारी आहे. बसा बडवत घंटा. काय मिळालं, घंटा.असे म्हणत त्यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.
आम्ही २५ वर्ष युतीत सडलोच. हाच का तो मित्र ज्याला २५ वर्ष बाळासाहेबांनी सांभाळले होते. सामनामध्ये जे येते ते येणारच. आम्ही कधीच सामना मध्ये नरेंद्र मोदींबद्दल चूकीचं काही लिहीत नाही.७० पैशांनी पेट्रोल वाढले तेव्हा अटल बिहारी वाजपेयी बैलगाडीने गेले होते,ती भाजप कुठे आहे? काश्मीरी पंडीतांवर हल्ले होत आहेत. तेव्हा का गप्प बसले आहात. मुख्यमंत्र्याची केंद्रावर टीका.संभाजी नगरचे नामकरण करण्याची काय गरज,आहेच संभाजी नगर. कोणाच्या हातात भोंगा, कोणाच्या हात हनुमान चालीसा देता आणि भाजप मजा पाहात बसता. भाजपवरती नाव न घेता टीका.
काही झालं की आम्ही टोमॅटो स्वास लावणार आणि पत्रकार परिषद घेणार, नाव न घेता किरीट सोमय्यांवर टीका.आम्ही २५ वर्ष युतीत सडलोच.हाच का तो मित्र ज्याला २५ वर्ष बाळासाहेबांनी सांभाळले होते. सामनामध्ये जे येते ते येणारच. आम्ही कधीच सामना मध्ये नरेंद्र मोदींबद्दल चूकीचं काही लिहीत नाही. ७० पैशांनी पेट्रोल वाढले तेव्हा अटल बिहारी वाजपेयी बैलगाडीने गेले होते, ती भाजप कुठे आहे? असं म्हणत उद्धव ठाकरेंनी विरोधकांवर टीका केली.
Edited By - Naresh Shende
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.