भंडारा : काँग्रेसच्या भरवश्यावर मोठे झाले तेच नेते आता कांग्रेस (Congress) विरोधात बोलू लागले आहेत असं म्हणत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी खंत व्यक्त केली ते भंडाऱ्यात बोलत होते. 'काँग्रेस बाप आहे, काँग्रेस बिन बुलाए मेहमान नाही' असही ते यावेळी म्हणाले.
काँग्रेसने देश स्वतंत्र केला असून कांग्रेसने देश मोठा केला आहे. त्यांमुळे हे लोक जर काँग्रेस विरोधात बोलत असेल तर ही त्यांची नादानी असल्याचंही पटोले म्हणाले.
हे देखील पहा -
न्याय व्यवस्थेवर संभ्रम व अविश्वास निर्माण होत आहे. मोदी सरकार सत्तेत आल्यापासून न्याय व्यवस्थेत भेदभाव होत आहे. सर्वाना समान न्याय मिळावा अशी अपेक्षा असतांना एकाला एक न्याय व दुसऱ्याला दूसरा न्याय केला जात असून लोकशाही हे घातक असल्याचे नाना पाटोले म्हणाले.
Edited By - Jagdish Patil
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.