
- अमर घटारे
Yashomati Thakur : इडी सरकारने महाविकास आघाडीचे सर्व निर्णय बदलण्याचा निर्णय घेतला आहे. काही निर्णय त्यांच्या फायद्यासाठी बदलून घेतले. मात्र जिथे अनाथ बालकांचा, एकल महिलांचा, दोन्ही पालक गमावलेल्या मुलांच्या हितासाठी घेतलेला निर्णय हे सरकार (maharashtra government) कसं काय बदलू शकते. सरकारमधील ही लोक असंवेदनशील आहे अशी टीका माजी मंत्री यशोमती ठाकूर (yashomati thakur) यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर केली. त्या अमरावती येथे बाेलत हाेत्या. (amravati latest marathi news)
यशोमती ठाकूर म्हणाल्या एका बांधकाम व्यावसायिकाला महिला व बाल कल्याण विभागाचा मंत्री केलं आहे. त्याला फक्त काँक्रीट जंगल बांधता येतं. त्यांची हृदय देखील काँक्रीट आहेत. अनाथ बालकांचा, एकल महिलांचा, दोन्ही पालक गमावलेल्या मुलांच्या हितासाठी घेतलेला निर्णय सरकार कसं काय बदलू शकतं असा सवाल ठाकूर यांनी उपस्थित केला.
ठाकूर म्हणाल्या अर्थ खात्यानं देखील यावर नकारात्मक शेरा दिला आहे. या सर्वांचा मी निषेध करते. बाल संगोपनासाठी प्रत्येक लाभार्थीला दरमहा दोन हजार 500 रुपये मिळावेत यासाठी महिला व बाल विकास मंत्री म्हणून मी पाठपुरावा केला होता. त्यानंतर महाविकास आघाडी सरकारमधील अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पात त्याबाबत घोषणा केली होती असंही ठाकूर यांनी नमूद केले.
त्या म्हणाल्या बाकीच्या गोष्टी या सरकारला चालतात आणि ज्यांना कुणी नाही त्यांच्यासाठी हे सरकार निर्दयीपणे निर्णय घेत आहे. मंत्र्यांची मनं आणि हद्य असंवेदनशील झाल्याचेही ठाकूर यांनी नमूद केले. ठाकूर यांचा राेख मंत्री मंगल प्रभात लाेढा आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हाेता.
Edited By : Siddharth Latkar
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.