Devendra Fadnavis Reaction : सरकार तर आता सेटल झालं! हा लोकशाही विजय, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणंवीस यांची प्रतिक्रिया

Devendra Fadnavis's reaction to Supreme Court decision: 'सरकार तर आता सेटल झालं, हा लोकशाही आणि लोकमताचा पूर्णपणे विजय आहे असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
Devendra Fadnavis's reaction to Supreme Court decision
Devendra Fadnavis's reaction to Supreme Court decisionSAAM TV

Maharashtra Political Crisis: सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत बोलताना फडणवीस यांनी हे सरकार तर सेटल झालं अशी प्रतिक्रिया दिली आहे. 'सरकार तर आता सेटल झालं, हा लोकशाही आणि लोकमताचा पूर्णपणे विजय आहे असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच देवेद्र फडणवीस यांनी सर्वोच्च न्यायालयाने पूर्णपणे घटनात्मक ठरवलेल्या सरकारच्या पत्रकार परिषदेत मी आपलं स्वागत करतो. पुढे बोलताना ते म्हणाले, सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्राच्या संदर्भात जो निकाल दिला आहे, या निकालाबद्दल आम्ही पूर्ण समाधान व्यक्त करतो आणि निश्चितपणे लोकशाहीमध्ये लोकशाहीचा आणि लोकमताचा आज पूर्णपणे विजय झालेला आहे असं यानिमित्ताने नमूद करतो.

Devendra Fadnavis's reaction to Supreme Court decision
Maharashtra Political Crisis: उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्याने CM शिंदेंना वाचवले! शरद पवारांचे 'ते' भाकीत अखेर खरं ठरलं

उद्धव ठाकरेंना पुन्हा मुख्यमंत्री होता येणार नाही

देवेंद्र फडणवीस म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालाने महाविकास आघाडीच्या मनसुब्यावर पूर्णपणे पाणी फेरलेय सर्वोच्च न्यायालयाने सांगितले स्टेटस्को अँटी करता येणार नाही. उद्धव ठाकरेंना त्यामुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करता येणार नाही. (Maharashtra Political News)

अपात्रतेचे अधिकार अध्यक्षांकडे - फडणवीस

फडणवीस म्हणाले. अपात्रतेच्या याचिकांसदर्भातील सर्व अधिकार अध्यक्षांकडे आहे. (निकाल वाचून दाखवला) सुप्रीम कोर्टाने यात हस्तक्षेप करण्यास नकार दिला आहे. अध्यक्षांना सर्व अधिकार दिले आहेत. (Latest Political News)

Devendra Fadnavis's reaction to Supreme Court decision
Uddhav Thackeray on Sc Vardict : '...तर पुन्हा मुख्यमंत्री झालो असतो', सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर उद्धव ठाकरे भावनिक

निवडणूक आयोगाला पूर्ण अधिकार - फडणवीस

निवडणूक आयोगाला पूर्ण अधिकार आहेत, हे न्यायालयाने स्पष्टपणे सांगितले आहे. निवडणूक आयोग अपात्रतेसंदर्भात पूर्ण स्वतंत्रपणे निर्णय घेऊ शकतं. त्यांनी केलेल्या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे गटाने केला होता. तो पूर्ण चुकीचा आहे हे यातून स्पष्ट झाले आहे. सगळे अधिकार हे निवडणूक आयोगाचे आहेत. त्यात कुठलीही बाधा नाही हे निकालात स्पष्ट सांगितले आहे. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com