
कोल्हापूर : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील या सरकारला नेमकं काय झालं आहे. राज्य सरकारलाच हिंदू मुस्लिम दंगे व्हावेत असं वाटतय का ? असा सवाल भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला. ते म्हणाले प्रशासन परवानगी घ्या आणि भोंगे लावा म्हणत आहे. राम मंदिराच्या विषयातही मुस्लिम समाजाजाने सामंजस्य दाखवलं आहे. तसच सामंजस्य इम्तियाज जलील दाखवत आहेत. तरीही शासन असं का करत आहे. राज्य सरकारलाच हिंदू-मुस्लिम दंगे व्हावेत असं वाटतंय का ? हे सरकार आहे ते जातीजातीत धर्माधर्मात वाद निर्माण करत असल्याचा गंभीर आरोपही पाटील (Chandrakant Patil) यांनी पत्रकारांशी बोलताना केला आहे.
दरम्यान, आज न्यायालयाने सरकारल स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका घेण्यास सांगितलं आहे. यावर बोलताना पाटील म्हणाले, 'हे सरकार ओबीसी आरक्षणाबाबत (OBC reservation) काम करत नाही. त्यामुळे आता ओबीसीं शिवाय निवडणूका घ्याव्या लागणार असून राज्य सरकारने ओबीसींच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. मात्र आम्ही OBCच्या पाठीशी असून ओबीसींच्या आरक्षित जागांवर भाजपा OBC उमेदवार उभे करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
हे देखील पाहा -
तसंच हिंदू देवतांची भोंगे ही पंरपरा नाही. राज ठाकरे यांचा मुद्दा भोंगे नाही तर तुष्टीकरण हा आहे. मुस्लिमांना एक न्याय आणि हिंदूना वेगळा न्याय असं मतासाठी केलं जातं. बाबरी मशिदीवेळी ही हिंदू समाज लढला तो कधीच थकला नाही. राम मंदिर बांधलंच ५०० वर्षे मुघलांनी राज्य केले म्हणून काय हा देश मुस्लिम झाला असें नाही असं पाटील यावेळी म्हणाले.
Edited By - Jagdish Patil
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.