मुंबई - गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात सत्तासंघर्षाचं राजकीय नाट्य सुरु होतं. मात्र, एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्रीपदासाठी आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री पदाची शपथ दिली. राजभवनात हा छोटेखानी शपथविधी सोहळा झाला. त्यानंतर सत्तानाट्याला पूर्णविराम लागला.
एकनाथ शिंदेंचा शपथविधी झाला मात्र त्यावेळी त्यांना पाठिंबा देणारे सर्व आमदार अद्याप देखील गोव्यात आहे. पण हे सर्व आमदार आज मुंबईत परतणार आहेत. नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः सर्व आमदार आज मुंबईत परतणार असल्याचे स्पष्ट केले.
हे देखील पाहा -
या आमदारांना परत आणण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खुद्द गोव्यात दाखल झाले आहे. मात्र हे आमदार मुंबईत परतण्याआधी आज सकाळी 11 वाजता सर्व आमदारांची बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये मंत्रिमंडळ आणि पुढील धोरणांबाबत चर्चा होणार असल्याची माहिती समोर आली आहे. या बैठकीनंतर सर्व आमदार मुंबईकडे निघणार आहेत.
गेले तीन दिवस गोव्यात मुक्कामाला असलेल्या 50 समर्थक आमदारांना घेऊन शिंदे आज दुपारनंतर मुंबईकडे रवाना होणार आहेत. दुसरीकडे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी सीआरपीएफचे दोन हजार जवान मुंबईत तैनात करण्यात आले आहेत. त्यामुळे कडक सुरक्षाव्यवस्थेत शिंदे गट मुंबईत दाखल होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, विधानसभेच्या अधिवेशनाची तारीख बदलण्यात आली आहे. विधानसभेचं अधिवेशन एक दिवस पुढे ढकलण्यात आले आहे. त्यामुळे 2 आणि 3 जुलैला होणारे अधिवेशन आता 3 आणि 4 जुलै रोजी होणार आहे. नव नियुक्त सरकारला बहुमत सिद्ध करण्यासाठी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी हे अधिवेशन बोलावलं आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.