
पावसाने ओढ दिल्याने शेतकरी आधीच संकटात आहे. पावसाअभावी पिकं करपू लागल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे. दुसरीकडे पिकांना योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी आणखी अडचणीत सापडला आहे. कांदा, टोमॅटो यासारख्या पिकांना भाव मिळत नसल्याने रस्त्यावर माल फेकण्याची नामुष्की शेतकऱ्यांवर ओढावली आहे.
आधीच अनेक अडचणींनी घेरलेल्या शेतकऱ्यांना आणखी एका अडचणीचा सामना करावा लागू शकतो. येत्या काळात खतांच्या किमती आणखी वाढण्याची शक्यता आहे. कारण रशियातील कंपन्यांनी डायअमोनियम फॉस्फेटसारखी (DAP) खते भारताला सवलतीच्या दरात देणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा परिणार भारतातील खतांच्या किमतीवर होऊ शकतो. (Latest Marathi News)
मार्केटमधील किमतींप्रमाणे रशियाने खतांचा पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भारतात खतांच्या किमती वाढू शकतात. याशिवाय चीनने देखील खतांची निर्यात कमी केली आहे.
मागील काही काळात रशियातून भारतात मोठ्या प्रमाणात खतांची आयात झाली होती. मात्र यापुढे सवलतीच्या दरात खत मिळणार नसल्याने भारताला खत खरेदीसाठी जास्त पैसे मोजावे लागू शकतात. यामुळे शेतकऱ्यांना देखील वाढीव किमतीत खत खरेदी करावे लागू शकते. सरकार यामध्ये शेतकऱ्यांना काही दिलासा देणार का हे पाहावे लागेल.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.