चंद्रपूर : जिल्ह्यात काळजाचा ठोका चुकवणारी घटना घडली आहे. वरोरा तालुक्यातील शेगाव येथे वीज कोसळून चार शेतकरी महिलांचा (farmers death) दुर्देवी मृत्यू झाला आहे. आज दुपारच्या सुमारास शेतात काम करत असताना या महिलांवर काळाने घाला घातला. वीज कोसळून (lightning strike incident) शेतकरी महिलांचा जागीच मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. हिरावती शालिक झाडे (४५), पार्वता रमेश झाडे (६०),मधुमती सुरेश झाडे(२०), रीना नामदेव गजभे वय (२०) अशी मृतांची नावं आहेत. या दुर्देवी घटनेमुळं परिसरात हळहळ व्यक्ती केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रपूरच्या (chandrapur) वरोरा तालुक्यात शेगावमध्ये एक दुर्देवी घटना घडली आहे. वीज कोसळून चार शेतकरी महिलांचा मृत्यू झाल्याने परिसर शोकाकूल झाले आहे. आज दुपारच्या सुमारास शेतात काम करत असताना शेतकरी महिलांना मृत्यूनं गाठलं. त्यामुळे मृतांच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर पसरला आहे.
Edited By - Naresh Shende
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.