
- संजय राठोड
यवतमाळ : गणपती बाप्पा माेरया... पुढच्या वर्षी लवकर या... अशा जयघाेषात यवतमाळ जिल्ह्यात आज (रविवार) सार्वजिनक गणेशाेत्सव मंडळ आपल्या लाडक्या बाप्पास निराेप देताहेत. यवतमाळ जिल्ह्यात तीन टप्यात विसर्जन (ganpati visarjan) करण्यात येत आहे. यामधील अंतिम टप्प्याचा आज प्रारंभ झाला. (Yavatmal Latest Marathi News)
यवतमाळ जिल्ह्यात दुसऱ्या टप्प्यातील रात्री विसर्जन पार पडलं. दरम्यान दुसऱ्या टप्प्यात ९८३ मंडळांनी बाप्पाला निरोप दिला. आज (रविवार) शेवटच्या टप्यातील विसर्जन पार पडणार आहे. त्यास प्रारंभ झाला आहे.
नऊ सप्टेंबर पासून सुरू झालेल्या विसर्जनासाठी प्रशासनाच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली होती. जिल्ह्यात विराजमान दोन हजार १९ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणेश मूर्तीचे विसर्जनाचे नियोजन करण्यात आले होते. गेली दोन वर्ष जिल्ह्यात कोरोना महामारीच्या सावटामुळे गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. त्यानंतर प्रथमच यंदा सर्व निर्बंध हटवण्यात आल्याने सर्वत्र गणेश उत्सवाची धूम पहायला मिळाली.
जिल्ह्यात २ हजार १९ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी बाप्पाची स्थापना केली होती. दहा दिवस मुक्काम झाल्यानंतर गणपती (ganpati) आता आपल्या परतीच्या प्रवासाला निघाले असून आज विसर्जनाचा शेवटचा दिवस आहे.
Edited By : Siddharth Latkar
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.