दिनू गावित
नंदुरबार: महाराष्ट्रात Maharashtra पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे विविध भागात पावसाने जोर धरला आहे. तसेच उत्तर महाराष्ट्र मध्येही जोरदार पावसाचे आगमन झाले आहे. अनेक ठिकाणी दरड कोसळण्याचा घटना घडत आहेत. पूल वाहून गेले आहेत त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. अशीच एक दुर्दैवी घटना नंदुरबार Nandurbar मध्ये घडली आहे.
हे देखील पहा-
सातपुडा Satpuda अतिदुर्गम भागातील धडगाव तालुक्यातून नंदुरबार जिल्ह्याच्या ठिकाणी येण्यासाठी लागणाऱ्या चांदसैली घाटात दरड कोसळल्याने रस्ता बंद झाला आहे. या परिसरातील उपचारासाठी येत असलेल्या एका महिलेचा दवाखान्यात वेळेवर पोहोचू शकली नसल्याने रस्त्यातच दुर्देवी अंत झाला आहे.
चांदसैली घाटात दरड कोसळल्याने रस्ता बंद असल्याने एक गृहस्थ त्यांच्या पत्नीच्या उपचारासाठी पायपीट करत निघाले होते. सदर महिलेच्या पोटात तीव्र वेदना होत असल्याने चालता येत नसल्यामुळे पतीने खांद्यावर टाकून तिला दवाखान्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. परंतु या महिलेचा वेळेवर उपचार न मिळाल्याने रस्त्यातच मृत्यू झाल्याने दुर्दैवी घटना घडली आहे. जिल्ह्यातील दुर्गम भागातील तोकड्या आरोग्य व्यवस्थेचा हा बळी म्हणावा लागेल. अतिदुर्गम भागातील नागरिकांच्या सोयी सुविधांकडे प्रशासनाचे नेहमीच दुर्लक्ष होत आहे.
Edited By-Sanika Gade
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.