
शुभम देशमुख
गोंदिया : राज्यात कोठेही पुरेसा पाऊस झालेला नाही. यामुळे नद्या देखील यंदा कोरड्याच आहेत. परिणामी धरणातील पाणी साठा देखील कमीच आहे. हीच परिस्थिती (Gondia) गोंदिया जिल्ह्यात पहावयास मिळाली (Rain) आहे. गोंदिया जिल्ह्यात असलेल्या ३२ मध्यम व लघु प्रकल्पांपैकी आतापर्यंत केवळ पाच प्रकल्पच फुल्ल झाले आहेत. मात्र इतर प्रकल्पांमध्ये पाणी नसल्याने पाण्याची समस्या उद्भवण्याची शक्यता वर्तविली जात आहे. (Tajya Batmya)
पावसाचे यंदा उशिराने आगमन झाले. यानंतर राज्यातील काही भागात मुसळधार पाऊस झाला. परंतु मागील २०-२५ दिवसांपासून पावसाने ओढ दिली असल्याने चिंतेचे वातावरण आहे. जून महिना कोरडा गेल्यानंतर जुलैत चांगला पाऊस झाला. या पावसाने काही धरणातील पाणी साठा वाढला. आजच्या स्थितीला गोंदिया जिल्ह्यातील गुमडोह प्रकल्पात ३४.५३ टक्के, कालीमाटी प्रकल्पात २०.८४ टक्के, रेहारी प्रकल्पात ३७.९९ टक्के, सोनेगाव प्रकल्पात २८.६७ टक्के, सालेगाव प्रकल्पात २८.३५ टक्के व ओवारा प्रकल्पात ४९.५७ टक्के पाणी साठा आहे.
पावसाची गरज
पावसामुळे नद्या, कालवे, प्रकल्पांमध्ये पाणी जमा झाले. मात्र ऑगस्ट महिन्यात काहीसा पाऊस पडल्यानंतर पाऊस गायब झाला. परिणामी प्रकल्पांना पाणी मिळाले नाही. पावसाळा अंतिम टप्प्यात आला आहे. किमान या कालावधीत तरी चांगल्या पावसाची गरज आहे. जेणेकरून प्रकल्प पाण्याने भरतील व आगामी काळातील पाण्याचा प्रश्न सुटेल.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.