
शुभम देशमुख
गोंदिया : गेल्या २०-२५ दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने गोंदिया जिह्यात जोरदार हजेरी लावली आहे. सलग दुसऱ्या दिवशीही जिल्ह्यात वीजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस (Rain) झाला आहे. यामुळे (Gondia) पिकांना जीवदान मिळाले आहे. जोरदार पावसाच्या बँटींगने बळीराजा सुखावला आहे. (Tajya Batmya)
राज्यभरात साधारण महिनाभरापासून पाऊस गायब झाला होता. यामुळे शेतकऱ्यांच्या नजर आकाशाकडे लागून होत्या. यात हवामान विभागाकडून ६ तारखेपासून पावसाचा इशारा दिला होता. त्यानुसार गोंदिया जिल्ह्यात सोमवारी पावसाने हजेरी लावली. यानंतर आज सलग दुसऱ्या दिवशी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. विजांच्या कडकडाटासह हजेरी लावली आहे.
शेतकरी सुखावला
पावसाचे आगमन झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. या पावसामुळे धान पिकांना नक्कीच फायदा होणार आहे. पावसाळा संपत आला असताना देखील मागील आठ दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे धान पिके हातातून जाण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली होती. मात्र दोन दिवस जोरदार पाऊस आल्याने धानपिकांना नवसंजीवनी मिळाली. प्रशासनाच्यावतीने नदीकाठावरील गावांतील नागरीकांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.