राज्यातील वारकऱ्यांना मानधन देण्याचा शासनाचा विचार...

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील वारकरी संप्रदायातील गायक, वादक, कीर्तनकार‌आणि प्रवचनकार यांना ५ हजार रुपये मानधन
राज्यातील वारकऱ्यांना मानधन देण्याचा शासनाचा विचार...
राज्यातील वारकऱ्यांना मानधन देण्याचा शासनाचा विचार...भारत नागणे

पंढरपूर : कोरोनाच्या Corona पार्श्वभूमीवर राज्यातील वारकरी संप्रदायातील गायक, वादक, कीर्तनकार‌आणि प्रवचनकार यांना ५ हजार रुपये मानधन देण्यास राज्य सरकारने मान्यता दिली असल्याची माहिती वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांनी दिली आहे.

यासंदर्भात काल सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख आणि महसूल मंत्री बाळासाहेब देशमुख यांच्या उपस्थितीमध्ये वारकरी साहित्य परिषदेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली आहे. या बैठकीमध्ये वारकऱ्यांना प्रति महिना ५ हजार रुपये मानधन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनामुळे राज्यभरातील धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यक्रम बंद आहेत.

हे देखील पहा-

याचा फटका कीर्तनकार ,प्रवचनकार, वादक आणि गायक अशा लोकांना बसला आहे. याबरोबरच फडकरी महाराज मंडळींचे कार्यक्रम बंद आहेत. यामुळे महाराज मंडळींवर उपासमारीची वेळ आली आहे. यासंदर्भात वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांनी महाराज मंडळींना प्रति महिना ५ हजार रुपये मानधन द्यावे, कलाकारांच्या मानधनात दुप्पट वाढ करावी.

राज्यातील वारकऱ्यांना मानधन देण्याचा शासनाचा विचार...
मुख्यमंत्र्यांकडून पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांना मिळणार रेनकोट

यासह इतर प्रमुख मागण्या केल्या होत्या. या मागण्यांवर चर्चा करण्यासाठी वारकरी साहित्य परिषदेच्या प्रतिनिधींसोबत बैठक झाली. या बैठकीमध्ये सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी वारकऱ्यांना मानधन देण्याच्या प्रश्नाबाबत सकारात्मकता दर्शविली आहे. यामुळे लवकरच आता राज्यातील महाराज मंडळींना दिलासा मिळणार असल्याचे विठ्ठल पाटील यांनी यावेळी सांगितले आहे.

Edited By- digambar jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com