वर्धा : गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील विविध भागात मुसळधार पाऊस (Rain) सुरू आहे. या पावसानं जनजीवन विस्कळीत झालं आहे. वर्धा जिल्ह्यातही मुसळधार पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यात कुठे जोरदार तर कुठे मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. त्यामुळे अनेक ठिकाणी गावात पाणी शिरले असून यशोदा नदीवरील पूल जोरदार पावसाने वाहून गेला आहे. (Wardha Rain Latest News)
जिल्ह्यातील देवळी तालुक्यातील डीगडोह गावाजवळील पूल पहिल्याच पावसात वाहून गेला आहे. पूल वाहून गेल्याने 5 ते 7 गावांचा संपर्क तुटला आहे. एकाच पावसात पूल वाहून गेल्याने बांधकामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पूल वाहून गेल्याने गावातील नागरिकांना गावाबाहेर पडणे कठीण झाले आहे.
देवळी-नागझरी मार्गावरील डिगडोह या गावालगतचा पूल दिनांक ४ जुलै च्या रात्रीच्या पावसामुळे पहाटे वाहून गेला. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. हा पूल नदीच्या पात्रातुलनेत अतिशय कमकुवत असल्याची तक्रार यापूर्वी विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांनी केली होती. मात्र या तक्रारीकडे बांधकाम विभागाने दुर्लक्ष केले. (Wadha Latest marathi News)
दरम्यान, नदीला आलेल्या पुरातील पाण्याचा प्रवास जास्त असल्याने तसेच पुलाची उंची कमी असल्याने हा पूल वाहून गेला. त्यामुळे परिसरातील 6 ते 7 गावांचा संपर्क तुटला. अशी माहिती स्थानिक नागरिकांनी दिली. आता हा पूल केव्हा दुरुस्त होतो याकडे विद्यार्थी व नागरिकांचे लक्ष लागले आहे.
Edited By - Satish Daud
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.