जळगाव :अनिल देशमुख, संजय राऊत यांना अटक करणारी एजन्सी वेगळी व जामीन देणारे न्यायालय आहे. जामीन देण्याचे कारण त्यामध्ये काहीतरी असावे. अटक करण्यामध्ये कुठल्याही लोकप्रतिनिधींचा सहभाग नसतो; त्यामुळे शरद पवारांनी केलेले वक्तव्य आम्हाला लागू होत नाही. शरद पवारांनी (Sharad Pawar) विनाकारण यामध्ये राजकारण करू नये; असा निशाणा मंत्री गुलाबराव पाटील यांनी साधला आहे. (Letest Marathi News)
अनिल देशमुख, संजय राऊत (Sanjay Raut) यांना केलेली अटक म्हणजे सत्तेचा दुरुपयोग केला जात असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला होता. शरद पवार यांच्या आरोपावर मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) प्रत्युत्तर देताना बोलत होते.
अटक करण्यामध्ये कुठल्याही लोकप्रतिनिधींचा सहभाग नसतो. त्यामुळे शरद पवारांनी केलेले वक्तव्य आम्हाला लागू होत नाही. दरम्यान संजय राऊत, अनिल देशमुख यांना अटक करणारी एजन्सी वेगळी आहे. तर जामीन देणारे न्यायालय आहे. इतके दिवस न्यायालयाने जामीन न देण्याचे कारण त्याच्यामध्ये काहीतरी असावं असे देखील गुलाबराव पाटील यांनी म्हटले आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.