
जळगाव : यंदा सर्वत्र दमदार पाऊस झाला आहे. यामुळे बहुतांश नद्यांना देखील पुल आले आहेत. यामुळे जिल्ह्यातील गेलेल्या गिरणा नदीवरील (Girna River) धरण देखील सलग चौथ्या वर्षी शंभर टक्के भरले आहे. आतापर्यंत झालेल्या पावसामुळे (Rain) जिल्ह्यातील १३ मध्यम प्रकल्पांपैकी दहा प्रकल्प हे ओव्हरफ्लो झाले आहेत. (Jalgaon News Heavy Rain)
सध्या परतीच्या पावसाला सुरवात झाली आहे. या दरम्यान सप्टेंबर महिन्यात झालेल्या दमदार पावसामुळे (Heavy Rain) जलसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. मध्यम प्रकल्पातील साठा देखील ९५ टक्के झाला आहे. तर मोठ्या प्रकल्पांचा साठा ९१ टक्क्यांवर पोहोचला आहे. यामुळेच (Jalgaon) जिल्ह्यातील १३ मध्यम प्रकल्पांपैकी १० प्रकल्प ओव्हरफ्लो झाले आहेत. यात अभोरा, सुकी, मोर, मंगरूळ, अग्नावती, हिवरा, अंजनी, बोरी, तोंडापूर आणि मन्याड हे दहा प्रकल्प ओव्हरफ्लो झाले आहेत.
८७ टक्के जलसाठा
गतवर्षी देखील चांगला पाऊस झाल्याने प्रकल्पांमध्ये ९० टक्के जलसाठा होता. यंदा आतापर्यंत जळगाव जिल्ह्यात एकूण जलसाठा ८७ टक्क्यांवर पोहोचला आहे. येत्या ऑक्टोबर मध्यंतरापर्यंत परतीचा पाऊस असण्याची शक्यता वर्तविली असून त्यामुळे हा जलसाठा १०० टक्क्यावर जाण्याची शक्यता आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.