जळगाव : बऱ्हाणपूर– अंकलेश्वर राज्य महामार्गावर अडावद येथून जवळच असलेल्या गवळी नाल्याजवळ ट्रक व पिकअपचा भीषण अपघात (Accident) झाला. मध्यरात्रीनंतर झालेल्या या अपघातात २ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर ३ जण गंभीर जखमी झाले आहेत. (Breaking Marathi News)
चोपड्याकडुन अजवदकडे येत असलेल्या ट्रक व जळगावहून चोपड्याकडे जात असलेला दुध डेअरीची पिकअप यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात पिकअपमधील दोन जण जागीच ठार झाले. तर अन्य तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना चोपडा येथे रूग्णालयात दाखल केले आहे. घटनेची माहिती मिळताच अडावद येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण दांडगे हे टीमसह घटनास्थळी दाखल झाले. यानंतर महामार्गावरील वाहतूक सुरळीत करत पंचनामा केला. तसेच ट्रक चालका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जगदीश कोळंबे हे करित आहेत.
मृतात शिक्षकाचा समावेश
अपघातातील मृतात चोपडा येथील नितीन दामू मोरे (वय ४५) हे कठोरा (ता. चोपडा) येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक होते. तसेच गणेश काशीनाथ देशमुख (वय 32) हे चोपडा येथील सुंदर गढीमधील रहिवासी होते. जखमीमध्ये गुड्डू देशमुख (वय ३०), बाबा देशमुख (वय ३२) व चुनीलाल देशमुख (वय ३१) हे तिघे चोपडा सुंदर गढी येथील रहिवासी आहेत.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.