
जालना : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी पाटील बेमुदत उपोषण सुरू केले आहे. मात्र या (Jalna News) उपोषणाची दखल अदयाप घेतली गेलेली नाही. यामुळे आजपासून पाणी आणि औषध (Maratha Aarkshan) त्यागण्याचा ईशारा मनोज जरांगे यांनी दिला होता. त्यानुसार आरोग्य सेवा घेणे त्यांनी बंद केले आहे. (Latest Marathi News)
मराठा आरक्षणासाठी गेल्या आठवडाभरापासून आंदोलन सुरु आहे. यात जालना येथे मनोज जरांगे पाटील हे बेमुदत उपोषणाला बसले आहेत. आज या उपोषणाचा तेरावा दिवस आहे. मराठा समाजासंदर्भात राज्य सरकारने काढलेल्या अध्यादेशात सुधारणा करण्यासाठी जरांगे यांनी राज्य सरकारला ४ दिवसांचा अल्टीमेटम दिला होता. हा अलटीमेटम काल संपला असून आजपासून त्यांनी (Maratha Reservation) अन्न त्याग आणि औषध घेण्यास ही नकार दिला आहे. आता जरांगे काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.तीन वाजता या ठिकाणी बैठक घेण्यात येणार आहे.
ते जिजाउंचे होऊच शकत नाही
त्यातच काही लोक मनोज पाटील जरागे यांच्या आंदोलनामुळे राज्यात अशांतता पसरली आहे. त्यामुळे त्यांना अटक करा; अशी मागणी करत आहे. त्यावर ही जरागे पाटील यांनी प्रतिक्रिया देताना जे कोणी अशांतता माजवत असेल असं म्हणत अटक करण्याची भाषा वापरत असेल ते जिजाऊचे होऊच शकत नाहीत.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.