
सातारा : विधानसभेत शिवसेना (shivsena) ,राष्ट्रवादी काँग्रेस (ncp) आणि काँग्रेस (congress) यांच्याकडे मिळुन १५३ एवढी मतं आहेत. मात्र आम्हांला मिळालेल्या पाठींब्यावर आम्ही १६३ पर्यन्त आहोत. आम्हाला यापुर्वी सुद्धा मदत केलेल्या अपक्षांमधील ४ ते ५ लोकांच मत राज्यसभा निवडणुकीत दुस-या बाजुला गेल्याचे दिसत आहे. परंतु यात जास्त काळजीचा विषय आहे असे वाटत नसल्याचे मत जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केले. (jayant patil news)
राष्ट्रवादी काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जलसंपदा मंत्री जयंत पाटील (jayant patil) हे आज (रविवार) सातारा (satara) जिल्ह्यातील माण तालुका दाै-यावर आले आहेत. त्यावेळी माध्यमांशी बाेलताना मंत्री पाटील यांनी आमच्यात कोणताच अंतर्गत वाद नाही असे स्पष्ट केले. पाटील म्हणाले उलट आम्हाला अपक्षांचा पाठींबा मिळाला. त्यातल्या चार ते पाच लोकांनी आम्हाला पाठिंबा दिला नाही असं दिसतय. राज्यसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंची (uddhav thackeray) नाराजी होणं सहाजिक आहे असेही पाटील यांनी नमूद केले.
त्यांचा (शिवसेनेचा) दुसरा उमेदवार निवडुन येणे गरजेचे होते मात्र तो आला नाही. झालेल्या मतदाना बाबत त्यांना खुलासा झाला असेल मात्र या बाबत त्यांचे आणि माझे बोलणं झाले नाही असेही पाटील यांनी नमूद केले.
Edited By : Siddharth Latkar
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.