सांगली: दोन दिवसापूर्वी काँग्रेस नेते नाना पटोले (Nana Patole) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर आरोप केले होते. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) नेत्यांनी पटोले यांच्यावर टीका केल्या आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज नाना पटोले यांच्यावर टीका केली आहे. भंडारा, गोंदिया जिल्ह्यामध्ये काँग्रेसनेच राष्ट्रवादीच्या पाठीत कित्येकवेळा खंजीर खुपसला आहे, अशी टीका पाटील (Jayant Patil) यांनी केली आहे.
आज जयंत पाटील सांगली एका कार्यक्रमात बोलत होते. मागचा इतिहास बघता तर राष्ट्रवादीने काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसला असा आरोप करण्याची कोणतीच जागा काँग्रेसला (Congress) शिल्लक नाही. तसेच काँग्रेसचा लेखाजोखा पाटील यांनी वाचून दाखवला.
राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर बोलताना पाटील म्हणाले, राज ठाकरे यांचे महाराष्ट्राच्या लक्षात आले आहे. त्यामुळे लोक फार गंभीरतेने राज यांना घेत नाहीत. त्यांच्या सभांना लोक जातात. कारण ते चांगल्या नकला करतात. त्यामुळे त्यांना बघण्यासाठी गर्दी होते. पण आता राज ठाकरे यांनाही आत्मचिंतन करण्याची गरज आहे, असंही पाटील म्हणाले.
Edited By- Santosh Kanmuse
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.