जालना: विहीरीत पोहण्याच्या किरकोळ वादातून 20 वर्षीय मुलाचा खून; शहरातून आज शांतता फेरी

अंबड पोलीस ठाण्यात 15 जणांविरोधात गुन्हा, आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी शहरातून शांतता फेरी. बाजारपेठेत कडकडीत बंद
शांतता फेरी
शांतता फेरीलक्ष्मण सोळुंके

लक्ष्मण सोळुंके

जालना: जालन्यातील अंबडमध्ये विहिरीत पोहण्याच्या वादातून झालेल्या दोन मुलांमधील किरकोळ वादातून एका मुलाला लोखंडी रॉडने बेदम मारहाण करण्यात आली होती. मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. त्यामुळे आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी शहरातून शांतता फेरी काढण्यात आली आहे. (Jalna Crime News)

शांतता फेरी
India Inflation: सर्वसामान्यांना पुन्हा झटका, फेब्रुवारीत घाऊक महागाई 13.11 टक्क्यांवर!

20 वर्षीय रामेश्वर खरात असं मृत्युमुखी पडलेल्या मुलाचं नाव आहे. या प्रकरणी मयत मुलाच्या काकांच्या फिर्यादीवरून अंबड पोलीस ठाण्यात 15 जणांविरोध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे देखील पहा-

दरम्यान, आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावं या मागणीसाठी आज अंबडमध्ये विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, व्यापारी महासंघाच्या वतीने शांतता फेरी काढून आरोपींना अटक करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी शहरातील बाजारपेठ देखील बंद ठेवण्यात येऊन कडकडीत बंद पाळण्यात आला. यावेळी पोलीसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com