
- राजेश भाेस्तेकर
रायगड : सकाळी पावणे पाच वाजता भोंगे (loudspeaker) लावले तर नियम मोडत नाही आणि सायंकाळी हनुमान चालीसा (Hanuman Chalisa) लावली तर भंग होतो, हा कुठचा न्याय, असा सवाल भाजप (bjp) नेते किरीट सोमय्या (kirit somaiya) यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान हनुमान चालीसाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) हे राजकारण करीत असल्याचा आरोप सोमय्या यांनी अलिबाग येथे केला आहे. (Kirit Somaiya latest Marathi news)
किरीट सोमय्या म्हणाले, मुख्यमंत्रिपदासाठी उद्धव ठाकरे यांनी आपला धर्म, संस्कृती, हिंदुत्व गहाण ठेवले आहे. एकीकडे महाविकास आघाडीच्या मंत्र्यांवर घोटाळ्यामुळे कारवाई होत आहे आणि दुसरीकडे मुख्यमंत्र्यांनी आपले तत्व गहाण ठेवले आहे.
दरम्यान, मुरुड तालुक्यातील कोर्लई गावातील मुख्यमंत्री ठाकरेंच्या नऊ एकर जमिनीवरील कथित १९ बंगल्यांबाबत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहाेत. या प्रकरणात खरी वस्तुस्थिती न्यायलयामार्फत जनतेसमोर येईल, असा दावा साेमय्यांनी केला आहे. यावेळी सोमय्या यांचे वकील अॅड किरण कोसमकर, अॅड अंकित बंगेरा, अॅड अमित देशमुख, अॅड सुहास कारूळकर, अॅड श्रीराम ठोसर, अॅड. अभिषेक सावंत, श्रीविष्णू शशीधरण, निखिल चव्हाण, अॅड मिलिंद साळावकर, अॅड् वैशाली बंगेरा हे उपस्थित होते.
Edited By : Siddharth Latkar
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.