
- रणजीत माजगावकर
Kolhapur News : पर्यटकांवर आर्थिक बाेजा पडत असल्याचे कारण सांगत आज (मंगळवार) स्थानिकांनी आणि पर्यटकांनी कोल्हापूर जिल्ह्यातील अंबा विशाळगड (amba vishalgad) मानोली ग्रामपंचायत परिसरतील प्रवासी वसुली टोल नाका हटविला. यावेळी आंदाेलकांनी जाेरदार घाेषणाबाजी केली. (Maharashtra News)
कोल्हापूर जिल्ह्यातील अंबा विशाळगड या परिसरात येणाऱ्या पर्यटकांवर मानोली ग्रामपंचायत अंतर्गत संयुक्त वन व्यवस्थापन समिती आणि वनपरिक्षेत्र मलकापूर यांच्यावतीने प्रवासी वसुली टोल नाका उभारला गेला. या टोल नाक्यामुळे या परिसरात येणाऱ्या पर्यटकांना नाहक आर्थिक भुर्दंड साेसावा लागत हाेता. हा टोल बंद करण्यासाठी पर्यटक आणि स्थानिकांनी वारंवार प्रशासनाला विनंती केली.
मात्र प्रशासनाने त्यावर काेणताच निर्णय घेतला नाही. अखेरीस आज (मंगळवार) स्थानिकांनी आणि काही पर्यटकांनी हा टोल नाका हटवला. मनमानी टोल वसूल केला जात असल्याच्या निषेधार्थ यावेळी जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली.
या टोल नाक्यावर वसुलीसाठी नेमलेली मुलं ही मानोली गावातील असून त्यांना वन विभागाचा पोशाख दिलेला होता. त्यांच्याकडे कसलेही ओळखपत्र नव्हते. ते वन विभागाचे कर्मचारी असल्याचे सांगून दमदाटी करीत असे अशी वारंवार अनेक जण तक्रारी करीत असतं. अखेर आज हा टोल नाका स्थानिक आणि काही पर्यटकांनी हटवलेला आहे.
Edited By : Siddharth Latkar
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.