
कोल्हापूर: लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे हे स्मृती शताब्दी वर्ष आहे. येत्या ६ मे ला शाहू महाराजांची १०० वी पुण्यतिथी आहे. त्या निमित्त कोल्हापूरमध्ये लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज (Lokraja Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj) कृतज्ञता पर्वाचं (Smriti Centenary Year) आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना आदरांजली वाहण्यासाठी आणि त्यांनी कृतज्ञता वाहण्यासाठी कोल्हापूरकर (Kolhapur) १०० सेकंद स्तब्ध आणि मौन राहत लोकराजांंना अनोखी श्रद्धांजली वाहणार आहेत. १८ एप्रिल ते २२ मे दरम्यान आयोजन करण्यात आलेल्या या उत्सवाचा मुख्य सोहळा ६ मे ला होणार आहे. (Kolhapurkar will be paused for 100 seconds! A unique tribute to Lok Raja Chhatrapati shahu maharaj)
हे देखील पाहा -
२२ मेपर्यंत सुरू राहणाऱ्या या कृतज्ञता पर्वात युवा पिढीसाठी वक्तृत्व स्पर्धा, पुस्तक प्रदर्शन, विज्ञान प्रदर्शन, सायकल फेरी, कोल्हापूरातील ऐतिहासिक वास्तूंच्या निवडक रेखाचित्रांचं प्रदर्शन भरवलं जाणार आहे. शाहु महाराजांच्या कार्यावर आधारित शंभर व्याख्यानं, शाहु फुटबॉल लीग, शाहु केसरी कुस्ती स्पर्धाही आयोजित करण्यात आली आहे. ६ मे रोजी १०० सेकंद स्तब्धता पाळून लोकराजाला आदरांजली वाहिली जाणार असून चित्ररथ मिरवणूकही काढली जाणार आहे. त्याचप्रमाणे नवउद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी लोकराजा स्टर्टअप आणि गुंतवणूकदार परिषद, कोल्हापूर मसाला आणि मिर्ची जत्रा, कोल्हापूरी चप्पल जत्रा, राधानगरी निसर्ग पर्यटन, धरण परिसर भ्रमंती असे अनेक कार्यक्रम या निमित्तानं होणार आहेत. या सर्व कार्यक्रमांसाठी कोल्हापूरकरांमध्ये कमालीचा उत्साह पाहायला मिळत आहे.
शाहू महाराजांचा थोडक्यात जीवनपट
शाहू महाराजांचा जन्म २६ जून इ.स. १८७४ रोजी कागल येथील घाटगे घराण्यात झाला. त्यांचे मूळ नाव यशवंत. त्यांच्या वडिलांचे नाव जयसिंगराव (आप्पासाहेब) तर आईचे नाव राधाबाई होते. कोल्हापूर संस्थानाचे राजे चौथे शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी आनंदीबाई यांनी १७ मार्च १८८४ रोजी यशवंतरावांना दत्तक घेतले, आणि 'शाहू' हे नाव ठेवले. सन १८८९ ते १८९३ या चार वर्षांच्या कालखंडात धारवाड येथे शाहू महाराजांचा शैक्षणिक आणि शारीरिक विकास झाला. शिक्षण चालू असतानाच १ एप्रिल १८९१ रोजी बडोद्याच्या गुणाजीराव खानविलकर यांच्या लक्ष्मीबाई या मुलीशी शाहू विवाहबद्ध झाले. या वेळी त्यांचे वय १७ वर्षांचे होते आणि लक्ष्मीबाई वय १२ वर्षांहून कमी होते. २ एप्रिल १८९४ रोजी त्यांचा राज्यारोहण समारंभ झाला. राज्याभिषेक झाल्यानंतर इ.स. १९२२ सालापर्यंत म्हणजे २८ वर्षे ते कोल्हापूर संस्थानाचे राजे होते. मुंबई येथे ६ मे १९२२ रोजी त्यांचे निधन झाले.
(माहिती स्त्रोत: विकिपीडिया)
Edited By - Akshay Baisane
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.