लातूर : गेल्या महिन्यात मराठवाड्यात पावसानं अक्षरशः कहर केला होता. लातुर जिल्ह्याची सोयाबीनचे कोठार अशी ओळख, पण याच पावसानं महापुराच रुप धारण केलं अन होत्याच नव्हतं झालं. राज्य शासनाने जाहीर केलेली मदत अत्यंत कमी असल्याने औसा येथील भाजपाचे आमदार अभिमन्यु पवार यांनी आज सकाळी औसा ते तुळजापूर शेतकऱ्यांसह पायी यात्रा काढली आहे.
हे देखील पहा :
सन 2019 मध्ये सरकारमध्ये असलेली व्यक्ती हेक्टरी 50 रुपयांची मदत अस सांगत होते. आता त्यांनी फक्त हेक्टरी 10 रुपयांची मदत केली आहे शेतातील सोयाबीन काढण्यासाठी एका बॅगला 5 हजार मजुरी लागत आहे. शेतकरी आता रब्बी हंगामाची तयारी करायची आहेत.
अडचणीत असणाऱ्या शेतकऱयांना अधिकची मदत मिळावी, याकरता राज्य सरकारला सुबुद्धी मिळावी यासाठी आई तुळजाभवानीला साकडं घालण्यासाठी ही पायी यात्रा काढली असल्याचे आमदार अभिमन्यू पवार यांनी सांगितले आहे. या पायी यात्रेत प्रभारी जिल्हाध्यक्ष संतोष मुक्ता, ऍड मुक्तेश्वर वागदरे, तालुकाध्यक्ष सुभाष जाधव शहराध्यक्ष लहु कांबळे, जिल्हा सरचिटणीस किरण उटगे, फईम शेख, शैलेश पाटील यांच्यासह अनेक शेतकरी या यात्रेत सहभागी झाले होते.
Edited By : Krushnarav Sathe
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.