लातूर: जळकोट महावितरणाचे उपविभागीय कार्यालय 23 वर्षानंतरही प्रलंबित

23 वर्षानंतर सुध्दा नागरिकांची हेळसांड
लातूर: जळकोट महावितरणाचे उपविभागीय कार्यालय 23 वर्षानंतरही प्रलंबित
दीपक क्षीरसागर

दीपक क्षीरसागर

लातूर: जिल्ह्यात 1999 साली पाच तालुक्याची निर्मिती झाली. जळकोट हा डोंगरी भाग असून विकासापासून अद्यापही वंचित आहे. इथ तालुका निर्माण झाल्यानंतर सर्व शासकीय कार्यालये सुरू होणे गरजेचे असताना महावितरणचे उपविभागीय कार्यालय अद्यापही सुरू झाले नसल्याने नागरिकांची मोठी हेळसांड होत आहे.

लातूर: जळकोट महावितरणाचे उपविभागीय कार्यालय 23 वर्षानंतरही प्रलंबित
पुणे: वरातीत नाचताना हाणामारी; गुन्हेगार तरुणाचा दगडाने ठेचुन खुन!

जळकोट तालुका निर्मितीपूर्वी अहमदपूर तालुक्यातील शिरूर ताजबंद गावातून माहवितरण कार्यालयाचा कारभार सुरू होता. आता जळकोट निर्माण होवून 23 वर्षे झाली. पण राजकीय इचछाशक्तीचा अभाव असल्यामुळे आजतागायत ही मागणी दुर्लक्षित आहे. नवीन विज जोडणी, बिलात दुरुस्ती, DP मध्ये बिघाड किंवा नवीन DP बसवणे आदी कामासाठी किमान 30 ते 50 किलोमीटर अंतरावरील शिरूर ताजबंद इथ चकरा माराव्या लागत असल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com