
लातूर - जिल्ह्यातील औसा (Ausa) तालुक्यातील उजनी येथील वीज सातत्याने गूल होत असून त्याकडे लाईनमनचे दुर्लक्ष होत आहे. गावातील नागरिकांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी शुक्रवारी गावातील १३२ केव्ही उपकेंद्राकडे धाव घेऊन कार्यालय बंद केले. तसेच शाखा अभियंत्यास घेराव घातला.
हे देखील पाहा -
उजनी हे औसा- तुळजापूर महामार्गावर गाव असून १५ ते २० हजार लोकसंख्या आहे. येथे मोठी बाजारपेठ आहे. त्यामुळे परिसरातील नागरिक विविध खरेदीसाठी येथे येतात. तसेच सतत येथे वर्दळ असते. गावात शासकीय व निमशासकीय कार्यालये आहेत. त्यामुळे थोडासाही वेळ वीज गूल झाली की कामकाजावर परिणाम होत आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वीज गूल होत आहे. लाईनमनच्या दुर्लक्षामुळे वीजपुरवठा सुरू होत नाही. चार दिवसांपासून गावातील नागरिकांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. वीजपुरवठ्याअभावी पाणीपुरवठा बंद झाला आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी गावातील १३२ केव्ही उपकेंद्राकडे धाव घेऊन कार्यालय बंद केले.
लाईनमनला तत्काळ निलंबित करावे अथवा बदली करावी, अशी मागणी करीत संताप व्यक्त केला. यावेळी माजी उपसरपंच धनराज लोखंडे, प्रवीण कोपरकर, दीपक वळके, प्रदीप रणखांब, बसवराज बर्दापुरे, मझरखान पठाण, बसवराज पाटील, श्याम सूर्यवंशी, अजिंक्य शिंदे, नामदेव जाधव, अनिल कळबंडे आदी उपस्थित होते.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.