गोगलगायींनी नुकसान केलेल्या शेतकऱ्यांना विशेष आर्थिक मदत द्यावी, धनंजय मुंडे यांची सरकारकडे मागणी

माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
dhananjay munde
dhananjay munde saam tv

रश्मी पुराणीक

मुंबई : आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना (Farmers issue) मदत देण्याचा निर्णय झाला असला तरी, बीड जिल्ह्यासह मराठवाड्यातील विविध जिल्ह्यात सोयाबीन व अन्य पिकांवर गोगलगायीचा प्रादुर्भाव झाल्याने जे नुकसान झाले होते, त्या शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय झाला नाही. याबाबत माजी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी नाराजी व्यक्त केली आहे. संबंधित शेतकऱ्यांना बोंड अळीच्या वेळी ज्याप्रमाणे मदत केली,त्या धर्तीवर विशेष आर्थिक मदत करण्याची मागणी माजी मंत्री तथा आमदार धनंजय मुंडे यांनी केली आहे.

dhananjay munde
आतापर्यंत मी शांत होतो, कदाचित चित्रा वाघ यांना माहित नसेल, संजय राठोड यांचा सणसणीत इशारा

आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत अतिवृष्टी झालेल्या शेतकऱ्यांना मदत करण्याचा निर्णय झाला.मात्र गोगलगायीच्या प्रादुर्भावाने सोयाबीनसह अन्य काही पिकांचे नुकसान झाले. त्या शेतकऱ्यांना तीन-चार पेरण्या करूनही काही हाती लागण्याची चिन्हे नाहीत.अशा शेतकऱ्यांना मदत करण्या बाबत विचार झाला नाही,म्हणून अशा गोगलगाईमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनाही निकष बाजूला ठेऊन विशेष आर्थिक मदत करण्याची मागणी धनंजय मुंडे यांनी केली आहे.

धनंजय मुंडे यांनी यासंदर्भात याआधीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे मागणी केली होती. आज मंत्रिमंडळ बैठकीत मदतीचा निर्णय झाल्यानंतर गोगलगायी संदर्भात निर्णय न झाल्याने धनंजय मुंडे यांनी नाराजी व्यक्त करत ट्विट केले आहे. मागील काळात बोंड अळीचा कापसावर प्रादुर्भाव झाला तेव्हा ज्याप्रमाणे विशेष आर्थिक पॅकेज द्वारे शेतकऱ्यांना मदत झाली होती,त्याच प्रमाणे मदतीची आवश्यकता असल्याचे धनंजय मुंडे यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हटले आहे.

dhananjay munde
Dagdi Chawl 2 : 'डॅडी' पुन्हा पडद्यावर झळकणार, 'दगडी चाळ २' चा ट्रेलर प्रदर्शित

बीड जिल्ह्यातील सुमारे चार हजार हेक्टर क्षेत्रातील सोयाबीन पिकांचे गोगलगायींनी नुकसान केले. शेतकऱ्यांनी तीन-चार वेळा पेरण्या केल्या,मात्र गोगलगायीचे नियंत्रणही नाही व हंगाम संपत चालला तरी पीक हाती लागण्याची काही चिन्हे नाहीत,अशी विदारक परिस्थिती शेतकऱ्यांची झाली आहे. हजारो हेक्टरवरील नुकसान झालेल्या शेती पिकांचे प्रशासनाने पंचनामे देखील केले आहेत. धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांच्या या परिस्थितीची सरकारला जाणीव करुन दिली आणि तातडीने विशेष आर्थिक मदत द्यावी,अशी मागणी केली.

Edited By - Naresh Shende

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com