अंबरनाथ : नागरिकांनी थकीत पाणी बिल भरावे यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने अभय योजनेची मुदत वाढविली आहे. विशेष म्हणजे अंबरनाथ (ambernath) आणि बदलापूर (badlapur) शहरातील ग्राहकांनी थकीत रक्कम एकरकमी भरल्यास नागरिकांना थकीत रक्कमेवरील दंडातून (fine) सवलत दिली जाणार आहे. याबाबतची माहिती मिलिंद बसनगार (कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण) यांनी दिली. (maharashtra jeevan pradhikaran news)
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून अंबरनाथ आणि बदलापूर शहरात पाणीपुरवठा केला जातो. या दोन्ही शहरांमध्ये मिळून मजीप्राचे ६० हजार ग्राहक असून त्यांच्याकडे १६१ कोटी रुपयांची पाणीबिलांची थकबाकी आहे. यापैकी ९४ कोटी रुपये मूळ थकीत रक्कम तर त्यावर ६७ कोटी रुपये दंड आकारण्यात आला आहे.
ही थकबाकी वसूल करण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने यापूर्वी अभय योजना लागू केली आहे. या योजनेला अद्याप हवा उत्तम प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे आता या योजनेची मुदत ३१ मार्च २०२३ पर्यंत वाढवण्यात आली आहे.
या कालावधीत थकीत रक्कम एकरकमी भरल्यास दंड पूर्णपणे माफ केला जाणार आहे. त्यामुळं या योजनेचा नागरिकांनी लाभ घ्यावा असं आवाहन महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता मिलिंद बसनगार यांनी केलं आहे. दरम्यान या आवाहनानंतर आणि अभय योजनेची मुदत वाढवल्यानंतर आता तरी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची थकबाकी वसूल होते का? हे पाहावं लागेल.
Edited By : Siddharth Latkar
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.