मुंबई : राज्याच्या राजकारणात वादळ उठवणाऱ्या शिंदे-फडणवीस सरकारवर (Maharashtra Government) मंत्रिमंडळ विस्ताराबाबत विरोधी पक्षांकडून टीका-टीपण्णी केली जात आहे. राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाले असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) त्यांच्या स्वागत समारंभात व्यग्र आहेत, अशी टीका राजकीय वर्तुळातून केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. नागरिकांमधून सरपंच करता, तसं जनतेतून मुख्यमंत्री निवडा. महाराष्ट्रातील जनता ठरवेल कोणाला मुख्यमंत्री करायचे. पंतप्रधानाची निवडणूकही जनतेतूनच करा. जनता ठरवेल कोणाला पंतप्रधान करायचे, अशा शब्दांत पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारसह भाजपवर हल्लाबोल केला आहे.
माध्यमांशी संवाद साधताना पवार म्हणाले, शिंदे-फडणवीस सरकारला मंत्रिमंडळ विस्तार करता आलं नाही. खातेवाटप करता आले नाही. महाराष्ट्रात मुसळधार पाऊस झाल्याने अडीअडचणी निर्माण झाल्या. नांदेड- हिंगोली नदीकाठच्या भागात अत्यंत वाईट अवस्था झाली आहे. विदर्भातबी दयनीय अवस्था आहे. शेतकरी अडचणीत आहे. शेतकरी आत्महत्या करत आहे.
खरीपाच्या पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काही ठिकाणी गोगलगायचा प्रादुर्भाव झाला आहे. मी विरोधी पक्षनेता म्हणून संपूर्ण भागाचा दौरा केला. तुम्ही सरकार म्हणून तिथे लक्ष घालून अडचणीत सापडलेल्या माणासाला बाहेर काढा. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे, हे कृतीतून दाखवा, असा सल्ला पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारला दिला आहे.
Edited By - Naresh Shende
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.