
Uday Samant on Uddhav Thackeray: सत्तासंघर्षाच्या निकालानंतर गुरुवारी उद्धव ठाकरे यांनी आपण नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिला असं म्हणाले. यावरूनच आता राजकरण तापलं आहे. उद्धव ठाकरे यांच्याकडे राजीनामा देण्याशिवाय पर्यायच नव्हता असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले होते. यानंतर आता उद्योगमंत्री उदय सामंत यांनीही ठाकरेंवर टीका केली आहे.
उदय सामंत म्हणाले आहेत की, ''ज्यांना नैतिकता नाही ते आता नैतिकतेचे धडे द्यायला लागले.'' ते म्हणाले, कालच्या निकालानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे विचलित झाले आहेत. पुन्हा त्यांचा राजकीय जीवनाशी खेळायचा हा उद्योग सुरू झालेला आहे. (Maharashtra News)
Uday Samant On Sanjay Raut : संजय राऊत यांनाही केलं लक्ष्य
संजय राऊत यांच्याबद्दल बोलताना उदय अमानत म्हणाले की, ''संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत तीन महिन्याच्या आत सरकार राहणार नाही, असे सांगितले. त्याला आता जनता बळी पडणार नाही.''
Uddhav Thackeray : काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?
उद्धव ठाकरे म्हणाले होते की, ''सुप्रीम कोर्ट निकाल देऊ शकतं, कारण त्यांचा अधिकार आहे. आता अधिकार अध्यक्ष यांच्याकडे दिला असला तरी व्हीप पक्षाच आहे, असं कोर्टाने सांगितलं. समोरच्याने आता सुधारणे आवश्यक आहे. माझी नैतिकता म्हणूण राजीनामा दिला. हापापलेल्यांना मी का फ्लोर टेस्टला समोर जावं.''
Devendra Fadnavis on Uddhav Thackeray : फडणवीस यांचं उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर
देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) म्हणाले होते की, "मी नैतिकतेने मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला, असे उद्धव ठाकरे म्हणतात पण भाजपसोबत निवडून आल्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाताना तुमची नैतिकता कुठे गेली होती."
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.