तबरेज शेख, प्रतिनिधी
Chhatrapati Sambhajinagar News: छत्रपती संभाजीनगरमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक पार पडणार आहे. एकीकडे राज्य मंडळाची बैठक पार पडत असतानाच विरोधकांनी मात्र बैठकीच्या थाटमाट- आणि खर्चावरुन राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्यानंतर आदित्य ठाकरेंनीही मंत्री- मंडळ बैठकीवरुन राज्य सरकारवर निशाणा साधला आहे...
काय म्हणाले आदित्य ठाकरे?
नुकताच छत्रपती संभाजीनगरचा (Chhatrapati Sambhajinagar) दौरा केला. या भागात शेतकऱ्यांची परिस्थिती बिकट आहे. पिकांना पाणी नसल्याने शेतकरी हतबल झाला असून सरकारकडून कसलीही मदत मिळत नसल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. तसेच शेतकऱ्यांना कर्जाची परतफेड करा अशा नोटिसा येत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
मंत्रीमंडळ बैठकीवरुन सोडले टीकास्त्र...
यावेळी बोलताना आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी मंत्रीमंडळ बैठकीवरुनही राज्य सरकारवर टीका केली. मंत्रिमंडळाच्या बैठकीतून काहीही अपेक्षा नाहीत. याऊलट नेत्यांमध्ये मंत्रिपदासाठी भांडणे सुरू आहेत. आजही ५० हजार कोटींच्या घोषणा होतील. मात्र घोषणा ,घोषणाच राहतात.. असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.
दरम्यान, आजच्या मंत्रिमंडळ बैठकीवरुन खासदार संजय राऊत यांनीही राज्य सरकारवर निशाणा साधला होता. "ही तीन ठगांची युती आहे. मराठवाड्यात दुष्काळ असताना वारेमाफ खर्च होत आहे. खाण्या- पिण्यावर लाखो रुपयांची उधळण होत असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली. एक डाऊटफूल आणि दो हाफ सत्तेत आहेत, असे राऊत म्हणाले होते. (Latest Marathi News)
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.