अमर घटारे
Maharashtra Politics : राज्यात शिंदे आणि ठाकरे असे दोन गट वेगळे झाल्यानंतर राजकारणात मोठा भूकंप आला. एकनाथ शिंदे यांच्यासह गेलेले सर्व आमदार हे गद्दार आहेत अशी टीका ठाकरे गटाकडून सातत्याने होत आहे. अशात आता अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी यावर एक मोठं वक्तव्य केलं आहे. काही लोकं आह्माला गद्दार म्हणतात. आम्ही गद्दार आहोत पण नेत्यांचे गद्दार आहोत, असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे. (Political News)
अमरावती जिल्ह्यातील तिवसा येथील शिवजयंतीच्या कार्यक्रमात बच्चू कडू उपस्थित होते. त्यावेळी उपस्थितांना संबोधित करताना बच्चू कडू म्हणाले की, 'काही लोकं आह्माला गद्दार म्हणतात. आम्ही गद्दार आहोत पण नेत्यांचे गद्दार आहोत. जनतेचे गद्दार आम्ही कधी होणार नाही. फक्त जनतेसाठी काम करणार नेत्यांची गुलामगिरी करणारा नाही असंही बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.
तसेच विश्वास आणि निष्ठेविषयी बोलताना पुढे ते म्हणाले की, 'निष्ठा नेत्यांवर,पक्षावर व माझ्यावरही ठेवू नका. निष्ठा आपल्या देशावर आपल्या बापावर ठेवा,असंही बच्चू कडू म्हणालेत. उद्धव ठाकरेंना सोडून शिंदे गटात गेल्यावर आमदार बच्चू कडू यांना नाशिकमध्ये काही लोकांनी अडवून गद्दार असं म्हंटल होतं, त्यावर त्यांनी यावेळी उत्तरं दिलं आहे.
ज्यावेळी उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत युती केली त्यावेळी त्यांनी असं का केलं? जनतेसाठी केलं की मुख्यमंत्री पदासाठी. या बाबत त्यांना आम्ही अनेकदा प्रश्न विचारला मात्र त्यांच्याकडे याचं उत्तर नाही. त्यामुळे आम्हाला फक्त जनतेसाठी काम करायचं आहे. आम्ही गद्दारी केली आहे मात्र जनतेसोबत नाही तर पक्षासोबत आम्ही गद्दारी केली, असंही या आधी एका कार्यक्रमात बच्चू कडू यांनी म्हटलं होतं.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.