Maharashtra News : राज्यावर सध्या पावसाचे (Rainfall) सावट आहे. ऐन उन्हाळ्यात गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागांमध्ये अवकाळी पाऊस कोसळत आहे. त्यामुळे राज्यातील शेतकरी चिंतेत आला आहे. अशामध्ये आता पुन्हा हवामान खात्याने पुढील तीन दिवसांसाठी राज्यातील अनेक जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. या जिल्ह्यांमध्ये राहणारे शेतकरी आणि नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आले आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. या जिल्ह्यांना ७ एप्रिलपर्यंत अवकाळी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भातील नागपूर, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा या जिल्ह्यांमध्ये ६ एप्रिल रोजी अवकाळी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
तर, ७ एप्रिल रोजी विदर्भातील गडचिरोली, गोंदिया आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भासोबतच पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये देखील अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये ६ एप्रिल म्हणजे आज पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
दरम्यान, या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपल्या शेतमालाची काळजी घ्यावी. शेतकऱ्यांनी हा शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा. त्याचसोबत नागरिकांनी देखील अवकाळी पावसावेळी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी. या पावसादरम्यान नागरिकांनी झाडाखाली उभं राहू नये. त्यासोबत विजेच्या तारा आणि खांबांजवळ जाऊ नये, असे देखील आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
Edited By - Priya Vijay More
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.