
Mahavitaran Strike : नुकतेच महावितरण कर्मचाऱ्यांनी तीन दिवसीय आंदोलनाला सुरुवात केली आहे. या आंदोलनाचा फटका सर्वसामान्यांना बसेल का ? हा प्रश्न प्रत्येक सामान्यांना भेडसावत आहे. महाराष्ट्रात हा संप आजपासून पुढील तीन दिवस सुरु राहाणार आहे. त्यातच नागरिकांनी संप सुरु झाला म्हणून वीज नसेल अशी भीती बाळगली आहे.
गेल्या दीड महिन्यापासून संपूर्ण महाराष्ट्रात महावितरण कर्मचाऱ्यांच्या समितीने आंदोलन करुन खासदार, आमदार,लोकप्रतिनिधी व इतर अनेक संघटना यांना भेटून वीज कंपन्यांचे खाजगीकरण करण्याचे शासनाचे असलेले धोरण निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला.जनतेने सुद्धा सरकारच्या खाजगीकरणाच्या धोरणाला विरोध करावा असे आवाहन करण्यात आले.
या संपाच्या कोणत्या राज्यात कसा परिणाम असले किंवा कोणाला याचा फटका बसणार नाही हे जाणून घेऊया.
महाराष्ट्रात सुरु असणाऱ्या महावितरण संपाचा मुंबई, पुणे, औरंगाबाद व नागपूर या महानगरांना फटका बसणार नाही. या शहरात अनेक खाजगी वीज वितरण कंपन्या असल्यामुळे वीज खंडित होणार नाही. असे सांगण्यात आले आहे.
तसेच या संपामध्ये ७५ टक्के कर्मचारी संपावर आहेत तर उर्वरित २५ टक्के कर्मचारी हे अद्यापह कामावर आहे. यामध्ये सांगली,सातारा कोल्हापूर भागात काही अंश प्रमाणात समस्या आली होती परंतु खंडित झालेला वीज पुरवठा पुन्हा व्यवस्थित करण्याचे कामं केले आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.