
जालन्यात अंतरवाली सराटी गावात मनोज जरांगे यांचं गेल्या १५ दिवसांपासून उपोषण सुरू आहे. मनोज जरांगे यांच्या उपोषणामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघालं आहे. मनोज जरांगे यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस उपोषण विनंती केली आहे. मात्र, मनोज जरांगे यांनी मी उपोषण सोडण्यास तयार आहे, मात्र उपोषणस्थळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनी यावं अशी अट ठेवली आहे. (Latest Marathi News)
मनोज जरांगे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी मनोज जरांगे म्हणाले, 'मराठा आरक्षण मिळेपर्यंत जागा सोडणार नाही. मराठ्यांना प्रमाणपत्र मिळेल तोपर्यंत मी घरी जाणार नाही. सरकारने जबाबदारी घेतली,मग मी घरी जाईन या भ्रमात राहू नका. आरक्षण मिळेपर्यंत साखळी उपोषण सुरू ठेवू.
'हातात सर्टिफिकेट पडतील, त्या दिवशी आंदोलन मागे घेईल. बोलता-बोलता आपले 15 दिवस गेले आहेत, पुढे महिना जाईल. मराठा आरक्षणासाठी सामान्य माणसाने आंदोलन उभं केला आहे. उग्र आंदोलन करू नका. सरकारला १ महिन्याची मुदत देत आहे. सरकारने 31 व्या दिवशी प्रमाणपत्र दिले पाहिजे, असे ते म्हणाले.
'उपोषण सोडायला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सर्व मंत्रिमंडळ, छत्रपती संभाजीराजे, उदयनराजे आले पाहिजे. आता महिनाभर गावात साखळी उपोषण सुरू करायचे आहे. पुढच्या महिन्यात 12 तारखेला मराठ्यांची इतकी मोठी सभा होईल, असेही जरांगे म्हणाले.
दरम्यान, 'मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळणार नाही, तोपर्यंत तसूभरही मागे हटणार नाही, अशी भूमिका मनोज जरांगे यांनी स्पष्ट केली आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.