औरंगाबाद: उन्हाचा पारा वाढल्यामुळे मराठवाड्यातील (Marathwada) धरण आणि प्रकल्पातील पाणीसाठ्यात झपाट्याने घट होताना दिसत आहे. मराठवाड्यातील सगळ्यात मोठ्या जायकवाडी धरणासह प्रमुख प्रकल्प आणि धरणांमध्ये बाष्पीभवनाचे प्रमाण वाढल्यामुळे यावर्षी पाणीसाठ्यात मोठी घट होत आहे.
यंदा पाऊस चांगला पडल्यामुळे सर्व धरण आणि प्रकल्पांमध्ये मुबलक पाणी साठा असल्यामुळे चिंता नव्हती. मात्र, या उन्हाळ्यात बाष्पीभवनाने चिंता वाढवायला सुरुवात केलीये. आणखी एक महिन्याचा काळ पावसासाठी असल्यामुळे धरण आणि प्रकल्पातील पाणीसाठा हा तळाला जातो की काय अशी भीती वाटत आहे.
सध्या जायकवाडी धरणात (Jayakwadi Dam) ५६ टक्के जलसाठा आहे. मागील वर्षी ५५ टक्के जलसाठा होता. धरणातून १.७ दलघमी पाण्याचे बाष्पीभवन झाले आहे.
मराठवाड्यातील मध्यम प्रकल्पांत ४५ टक्के, लघु प्रकल्पांत ३१ टक्के, गोदावरी बंधाऱ्यात ४७ टक्के, इतर बंधाऱ्यांत ८९ टक्के जलसाठा सध्या आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा लघु आणि मध्यम प्रकल्पांत बऱ्यापैकी साठा आहे.
मराठवाड्यातील मोठ्या ११ प्रकल्पात ५९.५२ टक्के जलसाठा आहे, तर ६५ मध्यम प्रकल्पात ४५.२ टक्के जलसाठा सध्या उपलब्ध आहे.
मराठवाड्यातल्या ७४९ लघु प्रकल्पात ३१.६१ टक्के जलसाठा आहे.
गोदावरी नदीवरच्या १५ बंधाऱ्यात ४७.९८ टक्के जलसाठा आहे तर इतर २५ बंधाऱ्यात ८९.१४ टक्के जलसाठा आहे. त्यामुळे आज घडीला मराठवाड्यातील एकूण ८७५ प्रकल्पात ५१.९५ टक्के जलसाठा आहे. महिनाभरापूर्वी हा साठा ६० टक्क्यांच्यावर होता, आता मेमध्ये यात कमालीची घट होण्याची शक्यता आहे.
Edited By: Pravin Dhamale
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.