
Political News: महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये अल्पवयीन मुली बेपत्ता असल्याची आकडेवारी समोर आली आहे. मुली बेपत्ता होण्याच्या घटनांचे प्रमाण वाढत चालले आहे. तसेच महिलांवरील अन्याय अत्याचाराच्या घटना देखील वाढताना दिसत आहेत. अशात आता या सर्वांवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. (Latest Politocal News)
राज ठाकरे यांनी मुली बेपत्ता होण्यामागचं मोठं कारण सांगितलं आहे. मुली गायब होण्यामागे सोशल मीडिया कारणीभूत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. आज नाशकात पत्रकारांशी बातचीत करताना त्यांनी या प्रश्नावर भाष्य केलं. तसेच महाराष्ट्र पोलिसांच्या कामगिरीवर देखीस राज ठाकरे बोलले आहेत.
या सगळ्या गोष्टींना सोशल मीडिया कारणीभूत आहेत. त्यावर ज्या गोष्टी पाहिल्या जातात त्यामुळे अनेक गोष्टींसाठी बुद्धीला चालना मिळते. हे काही नव्याने होत नाहीये. या आधी देखील अशा घटना घडल्यात. या आधी एका मुलाखतीमध्ये मी सांगितलं होतं की, महाराष्ट्र पोलिसांना ४८ तास द्या. एकदा देऊन तर बघा मग असली प्रकरण घडतात का तेही समजेल, असं राज ठाकरे म्हणाले.
महाराष्ट्र पोलिसांना त्यांच्या कामासाठी मोकळीक दिल्यास कोणत्याही महिलांवरील अत्याचाराच्या घटनांना आळा बसेल. तसेच मुलींच्या बेपत्ता होण्याचा छडा देखील लगेच लागले, अशा आशयाचं वक्तव्य राज ठाकरेंनी केलं आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.