औसा पॅटर्न राज्यभर राबवावा, आमदार अभिमन्यू पवार यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे मागणी

आमदार अभिमन्यू पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.
Mla Abhimanyu Pawar, CM Eknath Shinde
Mla Abhimanyu Pawar, CM Eknath ShindeSaam Tv

मुंबई : आमदार अभिमन्यू पवार यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची मुंबईत भेट घेतली. या भेटीत गतवर्षीपासून औसा विधानसभा मतदारसंघात शेत तिथे रस्ता अभियानाअंतर्गत सुरू असलेल्या शेतरस्ते तसेच मनरेगातून ग्रामसमृद्धी या अभियानातून शेतकरी समृद्धीच्या कामाची माहिती देऊन या दोन्ही अभियानास व्यापक स्वरूपात राज्यभर राबविण्यात यावे अशी मागणी आमदार अभिमन्यू पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. (Mla Abhimanyu Pawar News)

Mla Abhimanyu Pawar, CM Eknath Shinde
'आपल्या लोकांचा आवाज...'; मुर्मू यांना पाठिंबा देण्याच्या खासदारांच्या भूमिकेवर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया

आमदार अभिमन्यू पवार यांनी शेत तिथे रस्ता या संकल्पनेतून मतदारसंघात १ हजार किलोमीटर लांबीचे शेतरस्ते कामे व या शेतरस्ते कामाचे आमदार फंडातून मजबुतीकरण कामे मोठ्या प्रमाणात झाली असून यांचा फायदा शेतकऱ्यांना समृद्ध होण्यासाठी होताना दिसत आहे. राज्याला आदर्श आशा या औसा पॅटर्नची चर्चा राज्यासह दिल्ली दरबारी झाली आहे.

या अभियानामुळे शेतकऱ्यांना वेळेत शेती पिकांची रास करता येत असून तो माल योग्य वेळीला बाजारात जात असल्याने शेती मालाला योग्य भाव व शेतकऱ्यांच्या खिशातही वेळीत पैसा येत आहे. या शेतरस्ते अभियानामुळे शेतरस्त्यांमुळे होणारे वाद निवळले असून शेतकऱ्यांना शेतीपूरक व्यवसायाला चालना मिळत आहे. तर शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्नाचा स्रोत निर्माण व्हावा या हेतूने ग्रामसमृद्धी या अभियानाच्या माध्यमातून अंदाजे दीड हजार हेक्टरवर फळबाग लागवड झाली असून एक हजार शेतकऱ्यांना जनावरांचे गोठे मिळाले आहेत. (CM Eknath Shinde News)

Mla Abhimanyu Pawar, CM Eknath Shinde
जिल्हाध्यक्षापदावरून हकालपट्टीनंतर आमदार बांगर यांचे मुंबईत शक्तिप्रदर्शन; CM शिंदे म्हणाले...

शेततळे, गांडूळ व कंपोस्ट खत योजनेतून कृत्रिम खत उपलब्ध होत आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीत भर पडली आहे. एकंदरीत या सर्व अभियानाची माहिती आमदार पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना या भेटी दरम्यान दिली आहे.

शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर रेशीम उद्योगाकडे वळविण्याची आवश्कता असून रेशीम विभागाकडे असलेल्या तुटपुंज्या मनुष्यबळामुळे ते शक्य होत नसल्याचे त्यांना सांगून रेशीम विभाग कृषि विभागात वर्ग करून तुती लागवडीच्या योजना पोकराच्या धर्तीवर राबविण्यात याव्यात अशीही विनंती मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आल्याचे अभिमन्यू पवार यांनी सांगितले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com