Satara : 'बारामतीकरांचे राज्य आता संपलं आहे, हे ध्यानात घ्या अन् नीट वागा'
सातारा : ऊसाची आडवा आडवी जिरवा जिरवी करू नका, आता एकनाथ शिंदे (eknath shinde) आणि देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांचे सामान्य जनतेचे, शेतकऱ्यांचे (farmer), बळीराजाचे राज्य आले आहे असे आमदार महेश शिंदे (mahesh shinde) यांनी नमूद केले. दरम्यान आता बारामतीकरांचे राज्य संपलं आहे अशी टिप्पणीही आमदार महेश शिंदे यांनी करत हे ध्यानात घ्या आणि नीट वागा असा इशारा राष्ट्रवादी काॅंग्रसेला दिला आहे. (mahesh shinde latest marathi news)
तडवळे (ता. काेरेगाव) येथील एका कार्यक्रमात आमदार महेश शिंदे बाेलत हाेते. ते म्हणाले आमची काय ताकद आहे हे दाखवून दिलं आहे. त्यांच्या मालकाला पण धाेबीपछाड दिलं. दिवसा चांदण्या दाखवल्या. आमच्या नादाला लागला तर आम्ही किती बाद करु शकताे हे दाखवायचे काम आम्ही महाराष्ट्रास दाखविलं आहे.
काहीजण म्हणत आहेत आमदार महेश शिंदे याला पाडणार. हा हक्क तुम्ही कधीच गमावला आहे. खरंतर मी असला विचार कधीच करत नाही. जनताच तुम्हांला तुमची जागा दाखविणार आहे असा टाेला आमदार महेश शिंदे यांनी राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या नेत्यावर केला.
त्यामुळे तुम्हांला मत मागण्याचा अधिकार राहिला नाही. सातारा जिल्ह्यात आता बारामतीकरांना स्थान नाही. आज राज्यात शेतक-यांचे राज्य आले आहे. शिंदेशाही- फडणवीसांचे राज्य आले असून सामान्य जनतेसाठी ते झटत आहेत असेही आमदार शिंदे यांनी नमूद केले. या कार्यक्रमास काेरेगाव नगरविकास आघाडीचे पदाधिकारी, आजी- माजी नगरसेक, नगरसेविका उपस्थित हाेते.
Edited By : Siddharth Latkar
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.