Shahaji Bapu Patil Reaction: संजय राऊतांनी आता गुवाहाटीच्या जंगलात जावं; शहाजीबापू पाटलांचा खोचक टोला

Shahaji Bapu Patil Reaction on Supreme Court Result: सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर विविध राजकीय नेत्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी सुद्धा आपली प्रतिक्रिया दिली.
Shahaji Bapu Patil Reaction on Supreme Court Result
Shahaji Bapu Patil Reaction on Supreme Court ResultSaam TV

Shahaji Bapu Patil Reaction on Supreme Court Result: महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने आज ऐतिहासिक निकाल दिला. सुप्रीम कोर्टाने १६ आमदारांच्या अपात्रतेचा विषय विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला.

हा निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने अनेक निरीक्षणे नोंदवली. दरम्यान, निकालानंतर विविध राजकीय नेत्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी सुद्धा आपली प्रतिक्रिया दिली. (Breaking Marathi News)

Shahaji Bapu Patil Reaction on Supreme Court Result
Maharashtra Political Crisis: सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर शिंदे गटात आनंदी आनंद, पण झिरवळांनी एका वाक्यात हवाच काढली

काय म्हणाले शहाजीबापू पाटील?

सुप्रीम कोर्टाने लोकशाही टिकवाण्याचे काम केले त्याबद्दल कोर्टाचे आभार मानतो, असं म्हणत आमदार शहाजीबापूंनी सुप्रीम कोर्टाचे आभार मानले. सुप्रीम कोर्टाने केवळ सरकारच नव्हे तर आदरणीय बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या घशात जाण्यापासून वाचवली, असं सुद्धा शहाजीबापू म्हणाले.  (Maharashtra Political News)

'संजय राऊतांनी गुवाहाटीच्या जंगलात जावं'

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सुप्रीम कोर्टाच्या निकालाआधी आज सकाळी सूचक ट्विट केलं होतं. "काय झाडी ,काय डोंगर, काय हिरवळ, आज वाट पाहतोय तुमची, नरहरी झिरवळ..." असं संजय राऊत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं होतं.

Shahaji Bapu Patil Reaction on Supreme Court Result
CM Eknath Shinde: सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर CM शिंदेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, "अखेर सत्याचा विजय झाला"

दरम्यान, आमदार शहाजीबापू पाटील यांनी संजय राऊत यांच्या या ट्विटचा चांगलाच समाचार घेतला. संजय राऊत यांनी आता गुवाहाटीच्या जंगलात जावं आणि नरहरी झिरवळ यांनी झुरळ पकडायला जावं, असा खोचक टोला शहाजीबापू पाटील यांनी लगावला आहे.

मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होणार

राज्यातील सत्तासंघर्षाच्या निकालामुळं शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार लांबणीवर पडला होता. पण सुप्रीम कोर्टानं दिलेल्या निकालामुळे शिंदे सरकार स्थिर झाले आहे. त्यामुळे लवकर राज्यमंत्रिमंडळाचा दुसरा विस्तार होईल, असंही शहाजीबापू पाटील यांनी सांगितलं आहे.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com