सातारा : महाराष्ट्र राज्यांमध्ये शरद पवार साहेब (Sharad Pawar) आणि अजितदादा पवार (Ajit Pawar) यांच्यावर टीका केल्याशिवाय या महाराष्ट्रात कोणालाही महत्त्व प्राप्त होत नाही. सातारा जिल्ह्यामध्ये रयत शिक्षण संस्था आणि जरंडेश्वर कारखान्याबाबतीत टीका करून वेगळ्या प्रकारचे चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. जेवढ्या लोकांनी बारामतीचा नाद केला तेवढे संपले आहेत, अशा इशाराही आमदार शशिकांत शिंदे यांनी (Shashikant Shinde) यांनी दिला.
हे देखील पाहा
ज्या पवार साहेबांमुळे त्यांना राजकारणमध्ये आणि व्यवसायामध्ये ओळख मिळाली, ज्यांचा राजकीय जन्म हा पवार साहेबांच्या आशीर्वादामुळे झाला. त्यांनी पवार साहेबांच्यावर टीका करू नये, असा इशारा शशिकांत शिंदे यांनी दिला. राजकारणात पातळी उंचावण्यासाठी काहीजण टीका करतात त्यांना त्यांची जागा दाखविण्याची वेळ आली आहे, असंही शिंदे म्हणाले.
शरद पवार (Sharad Pawar) यांना देशाचे पंतप्रधानसुद्धा मान सन्मान देतात. बारामतीच्या जेवढे नादाला लागले तेवढे संपले. हर्षवर्धन पाटलांपासून जेवढ्या लोकांनी बारामतीचा नाद केला तेवढे संपले आहेत. भविष्य काळामध्ये महेश शिंदे यांना त्यांची जागा दाखवण्याची वेळ आली आहे, असा इशारा आमदार शशिकांत शिंदे यांनी आमदार महेश शिंदे यांना दिला आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.