- अमर घटारे
Yashomati Thakur News : लोकांना या भंकप बाजीचा कंटाळा आलेला आहे. खोटं बोल पण रेटून बोल अशी स्थिती आहे. शेतकऱ्यांकडे सरकारचे लक्ष नाही ही वस्तुस्थिती आहे. राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीच्या निकालाच्या माध्यमातून शेतक-यांचा आवाज सरकारपर्यंत पाेहचला अशी टीका राज्य सरकारवर आमदार य़शाेमती ठाकूर यांनी केली. (Maharashtra News)
राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीत काँग्रेस व मविआला मोठं यश मिळाले आहे. अमरावती जिल्ह्यात देखील काॅंग्रेसने बाजी मारली आहे. या विजयानंतर काँग्रेस नेत्या व आमदार यशोमती ठाकुर यांनी शिंदे- फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली. आगामी विधानसभा व लोकसभा निवडणुकीचा यातून अंदाज लावू शकतो की नक्की लोकांचा कल काय आहे. लोकांना या भंकप बाजीचा कंटाळा आलेला आहे खोटं बोल पण रेटून बोल अशी स्थिती आहे असे ठाकूर यांनी म्हटलं.
आमदार ठाकूर म्हणाल्या शेतकऱ्यांकडे सरकारचे लक्ष नाही. त्यामुळे आता तरी या माध्यमातून शेतकऱ्यांचा आवाज सरकारपर्यंत पोहोचला असं आम्हाला वाटते अशी टीका यशोमती ठाकूर यांनी सरकारवर केली.
Edited By : Siddharth Latkar
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.