उद्धव ठाकरे कमिटमेंटलाच चुकले, त्यांचा मुख्यमंत्री ही गोष्ट बरोबर - राज ठाकरे

उद्धव ठाकरे हे बोलतात वेगळं आणि आणि करतात वेगळं त्यामुळे त्यांच्यावरती विश्वास ठेवण्यासारखं काही नाही.
MNS chief Raj Thackeray criticizes Uddhav Thackeray
MNS chief Raj Thackeray criticizes Uddhav ThackeraySaam TV

मुंबई: माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) कमिटमेंटलाच चुकले, ज्याचे जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री ही बरोबर गोष्ट ठरलीय होती तर मग तुम्ही अडीच वर्षासाठी मुख्यमंत्रीपद मागताच कसे? असा सवाल उपस्थित करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.

काल एका मराठी वाहिनीने मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची मुलाखत घेतली होती. या मुलाखतीमध्ये राज ठाकरे यांनी अनेक विषयांवरती भाष्य केलं. आपल्या नेहमीच्या आक्रमक आणि परखड शैलीमध्ये त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावरती अनेक आरोप करत टीका देखील केली केली. (MNS chief Raj Thackeray criticizes Uddhav Thackeray)

MNS chief Raj Thackeray criticizes Uddhav Thackeray
सत्ता गेल्यामुळे काहीही वक्तव्य करायचे याला काही अर्थ नाही; कपिल पाटलांचा पवारांना टोला

या मुलाखती दरम्यान, राज यांना सध्याच्या राजकीय परिस्थिवरुन प्रश्न विचारण्यात आला की, काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत (NCP) जाऊन उद्धव ठाकरे चुकले असं आपल्याला वाटतं का? त्यांनी जायला नको होतं आपल्याला काय वाटतं. त्यावरती राज म्हणाले, मुळात तुम्ही पहिल्यांदा कमिटमेंटला चुकलात. ज्याचे जास्त आमदार त्यांचा मुख्यमंत्री ही गोष्ट बरोबर ठरली होती तर मग तुम्ही सांगताच कसे काय की अडीच वर्ष आम्हाला द्या, असं राज ठाकरे म्हणाले.

तसंच यावेळी ते म्हणाले उद्धव ठाकरे हे बोलतात वेगळं आणि आणि करतात वेगळं त्यामुळे त्यांच्यावरती विश्वास ठेवण्यासारखं काही नाही. शिवाय उद्धव यांच्याबद्दल अख्ख्या महाराष्ट्राला आणि देशाला जेवढं माहिती नाही तेवढ्य़ा जवळून मला माहिती असल्याचं ते या मुलाखती दरम्यान सांगितलं.

पुत्रप्रेमापोटी शिवसेना फुटली - राज ठाकरे

तसंच यावेळी त्यांनी शिवसेना फुटण्याचं कारण ही पुत्रप्रेमचं असल्याचं सांगितलं. ते म्हणाले, बाळासाहेबांच्या पुत्रप्रेमापोटीच शिवसेना फुटली, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या पुत्रप्रेमापोटीच शिवसेना फुटली सेना फुटीला दुसरं कोणतंच कारण नाही.

शिवसेना पक्ष बाळासाहेब ठाकरेंचा होता आणि तो पक्ष बाळासाहेबांसोबत गेला, आताच्या शिवसेनेत त्यांचे विचारही नाहीत. आज जे सेनेच्या पक्षप्रमुख आहेत त्यांच्या अंगावर मराठी किंवा हिंदुत्वाच्या नावाने एक तरी खटलादाखल आहे का? त्यांनी या विषयावरती मोर्चा काढला, आंदोलन केलं असं काहीच नाही. त्यांची अनेक भाषणं ऐकलीत तर बाळासाहेबांच्या तोंडातील २-४ वाक्य सोडली तर त्यांनी काय हिंदुत्व मांडलंय मला सांगावं असंही राज या मुलाखातीत म्हणाले.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com