MNS Gudi Padwa Rally: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मेळाव्यातून मनसेच्या संदीप देशापांडे यांनी आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर जहरी टीका केली आहे. मनसे संपलेला पक्ष आहे अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली होती. या टिकेला उत्तर देताना हाच पक्ष आदित्य ठाकरेंना त्यांची लायकी दाखवेल, असा इशारा संदीप देशपांडे यांनी दिला.
दिवंगत बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण मनसेने पूर्ण केलं. त्यांची इच्छा होती मशीदीवरील भोंगे उतरवावे. ते भोंग उतरवण्यासाठी मनसैनिक रस्त्यावर उतरले होते. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत मनसे हा पक्ष सत्तेत असल्याशिवाय राहणार नाही, ही काळ्या दगडावरील पांढरी रेघ आहे, असंही संदीप देशपांडे यांनी म्हटलं. (Political News)
मनसे पक्षाला स्थापन होऊन 17 वर्ष झाली. या 17 वर्षात आपण मोठा संघर्ष केला. मनसे कार्यकर्ते निवडणुकीत यश आले किंवा अपयश आले, कधीही घाबरले नाहीत. संघर्ष करण्यासाठी रस्त्यावर उतरायला कधीही मागे हटले नाही. अपयशाला घाबरु आणि यशाने माजू नका ही शिकवण आम्हाला राज ठाकरेंनी दिली, असं संदीप देशपांडे म्हणाले.
आम्हाला राज ठाकरे साहेबांचा अभिमान आहे. कारण आमच्या नेत्याने जे मिळवलं ते स्वकर्तृत्वाने मिळवलं. कुणाचातरी मुलगा म्हणून आम्हाला काही मिळालेलं नाही, असा टोलाही संदीप देशपांडे यांनी लगावला.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.