उल्हासनगर : उल्हासनगर महानगरपालिका निवडणूका जवळ येत असताना, काँग्रेस पक्षातर्फे आज उल्हासनगर मध्ये आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी त्यानी देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरींवर निशाणा साधत जोरदार टीका केली.
हे देखील पहा :
भाई जगताप म्हणाले, माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यानी नुकतंच एक वक्तव्य केलं, कि मला वाटतं आजही मीच मुख्यमंत्री आहे. फडणवीस यांच्या या वक्तव्यामुळे त्यांचं मानसिक संतुलन बिघडलं आहे, हे दिसून येतंय. आपल्या पाच वर्षाच्या कार्यकाळात राज्याची वाट लावणारा मुख्यमंत्री कोण झाला असेल तर ते फडणवीस आहेत असा शाब्दिक प्रहार जगतापांनी केला.
पुढे बोलताना ते म्हणाले, फडणवीसांनी कधीच महाराष्ट्र आणि मुंबई साठी काही केले नाही. मोदींना खुश करण्यासाठी महाराष्ट्र मधील फायनांशियल सेंटर गुजरात मध्ये पाठवलं. नितीन गडकरी मोठं मोठ्या गोष्टी करतात. मात्र, जेएनपीटी मधील महत्वाचा भाग असणारे ट्रान्सपोर्टेशन गुजरात मध्ये पाठवण्यात आलं. तर, जनआशीर्वाद यात्रा काढण्याचा मोठा प्रयत्न देवेंद्र फडणवीसांनी केला. मात्र, त्यांना जनतेने पळवून लावलं असून फडणवीस यांच्या डोक्यावर मोठा परिणाम झाला आहे, अशी टीका भाई जगताप यांनी केली.
Edited By : Krushnarav Sathe
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.