भंडारा : भंडारा-गोंदिया पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादीने (NCP) आमच्या पाठीत सुरा खुपसला असल्याते वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केलं आहे. राज्यात सत्तेवर असणाऱ्या महाविकास आघाडी सरकरामधील मित्र पक्षांमधील अंतर्गत वाद अधून मधून बाहेर येत असतात. या सरकारमधील मित्र पक्ष असणाऱ्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा (Congress And NCP) असाच एक वाद चव्हाट्यावर आल्याने राज्य सरकारमध्ये अंतर्गत मतभेद आणि आपआपल्या पक्षासाठी महाविकास आघाडी धर्माला फाटा दिल्याचं समोर आलं आहे. आघाडीतील वादाचं कारण म्हणजे भंडारा-गोंदिया पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादीने आपणाला धोका दिल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात येत आहे.
आज भंडारा जिल्हा परिषदेच्या (Bhandara Zilla Parishad) अध्यक्षपद काँग्रेसकडे आलं आहे तर उपाध्यक्षपद भाजपकडे गेलं आहे. या निवडणुकीत काँग्रेसने भाजपसोबत युती केल्याची चर्चा सुरु होती. दरम्यान आम्ही भाजपसोबत युती केली नाही. तर २१ जिल्हा परिषादेच्या सदस्यांसह काँग्रेस हा भंडारा जिल्हा (Bhandara) परिषदेतील सर्वात मोठा पक्ष असून भाजपचे ६ सदस्य फुटून काँग्रेसमध्ये आले आणि त्यांनी काँग्रेसला पाठिंबा दिला. त्यामुळे भंडाऱ्यात काँग्रेसचा सदस्य जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदावर बसल्याचं काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे (Atul Londhe) यांनी सांगितलं. तसंच काँग्रेस नव्हे तर राष्ट्रवादीनेच भाजपसोबत युती केली असल्याचं लोंढे यांनी सांगितलं होतं.
लोंढे यांच्या वक्तव्याचा पुनरुच्चार आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. पटोले म्हणाले, राष्ट्रवादीने अनेक ठिकाणी भाजपसोबत युती करत सत्ता स्थापन केली आहे. आम्ही जयंत पाटील व प्रफुल पटेल, यांच्यासोबत बोलणं झाल्यावरही राष्ट्रवादीने प्रत्येक ठिकाणी भाजपासोबत युती केली. गोंदिया जिल्हा परिषदेत सुध्दा राष्ट्रवादी भाजपसोबत जात युती केली आहे. त्यांमुळे राष्ट्रवादीने आमच्या पाठीत सुरा खुपसला असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला ते भंडाऱ्यातील निवडणूक निकालानंतर बोलत होते.
Edited By -Jagdish Patil
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.