
सागर निकवाडे
नंदुरबार : राज्य सरकारच्या उत्पादनाचा ५ टक्के निधी हा दिव्यांगांसाठी खर्च करण्याचा कायदा असतानाही (Nandurbar) राज्य सरकार याकडे दुर्लक्ष करत असल्याचे समोर आले आहे. राज्य सरकारने दिव्यांगांच्या निधी संदर्भात योग्य भूमिका न घेतल्यास राज्य सरकारच्या विरोधात उपोषणाचा इशारा (Bachchu Kadu) बच्चू कडू यांनी दिला आहे. (Breaking Marathi News)
दिव्यांग कल्याण विभागाच्यावतीने दिव्यांगाच्या दारी अभियान अंतर्गत आमदार बच्चू कडू नंदुरबार येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिर येथे दिव्यांग मेळाव्यात बोलत होते. सरकारने येत्या काही दिवसात निधीच्या संदर्भात योग्य भूमिका न घेतल्यास सरकारच्या विरोधातही बेमुदत उपोषण करू आणि सरकारला जागा दाखवू; असा इशारा त्यांनी नंदुरबारच्या मेळावातून दिला आहे. आमदारांच्या निधीतूनही जवळपास दरवर्षी ३० लाख रुपये दिव्यांगांसाठी खर्च करणे गरजेचे असते. मात्र राज्यातील ९९ टक्के आमदार हा निधी खर्च करत नसल्याचे समोर आले असल्याचे कडू यांनी सांगितले
गुवाहाटीला गेल्याने दिव्यांग मंत्रालय
गुवाहाटीला जाऊन आम्ही पन्नास खोके म्हणून बदनाम झालो. मात्र गुवाहाटीला मी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी स्वातंत्र्य दिव्यांग मंत्रालयाच्या आश्वासन दिल्यामुळे गेल्याचं सांगितले. आपण राज्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंकडे ही मागणी केली होती. मात्र त्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याचा ही आरोप त्यांनी केला.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.