
सागर निकवाडे
नंदूरबार : गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात पाऊस नाही. यामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकरी (Farmer) संकटात सापडला असून शेतकऱ्यांच्या भावना जाणून घेण्यासाठी (Nandurbar) नंदुरबारच्या जिल्हाधिकारी मनीषा खत्री थेट शेताच्या बांधावर पोहचल्या. पिकांची पाहणी करत त्यांनि शेतकऱ्यांशी संवाद साधला. (Latest Marathi News)
नंदुरबार जिल्ह्यात गेल्या २०-२५ दिवसापासून पावसाने दडी मारली आहे. यामुळे दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून नंदुरबार जिल्ह्याचा जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी शेतकऱ्यांचा बांधावर (Rain) जाऊन पाहणी करत शेतकऱ्यांचा भावना जाणून घेतल्या आहेत. जिल्हा प्रशासन संभाव्य टंचाई आणि दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सतर्क असून शेतकऱ्यांनी आपले होणारे नुकसान काढण्यासाठी इ पीक पाहणी अँपवर पीक पेराची नोंदणी करण्याचा आव्हान देखील यावेळी करण्यात आला.
दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून येणाऱ्या काळात चारा टंचाईचा सामना देखील करावा लागू शकतो. या अनुषंगाने चारा छावण्यासाठी प्रशासनाकडून शासनाकडे पाणी पुरवठा सुरू असल्याची माहिती देखील जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी दिली.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.