
सागर निकवाडे
नंदुरबार : एकीकडे देश प्रगती करत आहे. तर आजही दुर्गम भागात सुविधा मिळत नसल्याचे चित्र आहे. याचे उत्तम उदाहरण (Nandurbar) नंदुरबार जिल्ह्यात पाहावयास मिळत आहे. कारण स्वातंत्र्याच्या ७६ वर्षांनंतरही जिल्ह्यातील २८ गावांमध्ये अद्याप वीज पोहचलेली नाही. (Live Marathi News)
भारताला स्वातंत्र होऊन ७६ वर्ष उलटले आहेत. मात्र नंदुरबार जिल्ह्यातील नर्मदा काठावरील २८ गावांमध्ये वीज पोहोचलेली नाही. धडगाव तालुक्यातील (Narmda River) नर्मदा काठावरील २६ गावातील कुटुंबांना वीज मिळाली नाही आहे. वीज नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे देखील शैक्षणिक नुकसान होत आहे. आजही या गावांतील घरांमध्ये दिवा लावावा लागत आहे.
लोकप्रतिनिधी नंतर फिरकेना
निवडणुका आल्या कि गावातील लोकांसमोर मोठमोठ्या घोषणा देऊन लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायतसाठी मतदान करून घेतात व निवडून येतात. परंतु निवडून आल्यानंतर कोणी लोकप्रतिनिधी सुविधा पुरविण्यास पुढे येत नाही. या गावातील लोकांच्या मूलभूत सुविधांकडे कोण लक्ष देईल असाच प्रश्न आता उपस्थित होत आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.